IND vs WI: टी-20 मध्ये व्हाईट वॉशनंतर विराट कोहली, रोहित शर्मा यांनी घेतली टीम इंडियाचा चाहता Leory याची खास भेट, पहा हा भावनिक Video

भारताच्या तिसऱ्या टी-20 विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या चाहत्याकडे गेले आणि त्याने त्यांना सेल्फीस घेण्यास भाग पाडले. बीसीसीआयने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

IND vs WI: टी-20 मध्ये व्हाईट वॉशनंतर विराट कोहली, रोहित शर्मा यांनी घेतली टीम इंडियाचा चाहता Leory याची खास भेट, पहा हा भावनिक Video
विराट कोहली, लिओरी आणि रोहित शर्मा (Photo Credit: @indiancricketteam/Instagram)

भारत (India)-वेस्ट इंडिज (West Indies) संघातील 3 सामन्याच्या मालिकेत विंडीजचा व्हाईट वॉश करत भारताने मालिकेट विजय मिळवला. टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 7 विकेट्सने मात दिली आणि व्हाईट वॉश पूर्ण केला. यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजशी वनडे मालिकेत आमने-सामने असतील. दोन्ही संघातील अंतिम टी-20 सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टीम इंडियाचा फॅन लिओरी याची भेट घेतली. आणि त्याच्या सोबत फोटो क्लिक केले. भारताच्या तिसऱ्या टी-20 विजयानंतर कोहली आणि रोहित या चाहत्याकडे गेले आणि त्याने त्यांना सेल्फीस घेण्यास भाग पाडले. बीसीसीआयने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोहली आणि रोहितऐवजी लिओरीने भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची देखील भेट घेतली. (IND vs WI 3rd T20I मॅचनंतर रोहित शर्मा याने घेतली रिषभ पंत याची मुलाखत; युजवेंद्र चहल याने प्रश्न विचारात BCCI ची घेतली फिरकी)

बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये लिओरी कोहली त्याचा खेळ कसा परिपक्व झाला आहे आणि गोलंदाजीत निराश होणे त्याला कसे आवडते हे कुणाला ऐकू येतेय. या चाहत्याला भेटण्यासाठी रवीसह भारतीय कर्णधार आणि रोहित यांनी दिलगिरी व्यक्त केली. बीसीसीआयने चित्रांसह व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शन देत लिहिले की, 'लियोरीने कर्णधार, उपकर्णधार आणि प्रशिक्षक यांची भेट घेतली. टीम इंडियाचा चाहता, भारतीय क्रिकेट ज्याच्या सर्वात जवळ आहे. '

विंडीजविरुद्ध तीन टी-20 सामन्याची मालिका भारताने 3-0 ने जिंकली. शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने रिषभ पंत आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेट्सने विंडीजचा पराभव केला. भारताचा यष्टीरक्षक पंतने आतंरराष्ट्रीय टी-20 मध्ये दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. तिसऱ्या सामन्यात 65 धावा करताना त्यानं भारताकडून टी-20 मध्ये यष्टीरक्षकाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. वेस्ट इंडीजसाठी त्याचा तडाखेबाज फलंदाज कीरोन पोलार्ड याने 58 धावांची खेळी केली. पोलार्डने तब्बल सात वर्षांनी टी-2- सामन्यात अर्धशतक केलाय.

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2019 08:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).