Ravi Shastri on Team India: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने कसोटी-वनडे मालिका गमावली, माजी प्रशिक्षक म्हणाले - ‘काळजी करण्यासारखे काय आहे?’
भारताच्या कसोटी आणि वनडे पराभवावर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एका पराभवानंतर संघाचा दर्जा घसरत नाही. कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारत प्रबळ दावेदार होता. पण भारताने सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकली पण Proteas च्या शानदार पुनरागमनाने 3-कसोटींची मालिका 21 ने गमावली. त्यांनतर एकदिवसीय सिरीजमध्ये त्यानां क्लीन स्वीप पत्करावा लागला.
Ravi Shastri on Team India: मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिका जिंकल्यानंतर, नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात पहिला परदेश दौरा भारतीय संघासाठी (Indian Team) त्रासदायक ठरला आणि तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यासह पाचही सामने गमावले. तथापि, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) हातून झालेल्या दारुण पराभवानंतर फारशी चिंता नाही आणि त्यांनी हा एक तात्पुरता टप्पा मानला आणि संघ लवकरच जिंकण्यास सुरुवात करेल असे म्हटले. शास्त्री म्हणाले की, एक मालिका गमावल्यानंतर लोक टीका करतात पण खेळत असलेल्या प्रत्येक सामना कोणीही जिंकू शकत नाही परंतु ते बर्याच काळापासून नंबर 1 आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या सर्वोत्तम स्थितीत परत येण्यास जास्त वेळ लागणार नाही. (IND vs SA ODI 2022: भारतावर 3-0 एकदिवसीय मालिका विजयानंतर केशव महाराजची इंस्टाग्राम पोस्ट, म्हणाला - ‘जय श्री राम’)
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना शास्त्री म्हणाले, “तुम्ही एक मालिका गमावली, तर तुम्ही टीका करायला सुरुवात केली... तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही, त्यात विजय-पराजय असेल. दर्जा अचानक कसा घसरेल? पाच वर्षांसाठी तुम्ही जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ आहेत.” 1983 विश्वचषक विजेत्याने पुढे म्हटले की संघ अचानक खराब होऊ शकत नाही आणि जरी त्याने मालिकेतील एकही चेंडू पाहिला नसला तरी आगामी मालिकेत संघाच्या पुनरागमनाची त्यांना खात्री आहे. “गेल्या पाच वर्षात तुमचे विजयाचे प्रमाण 65 टक्के असताना, काळजी करण्यासारखे काय आहे?, आमच्या प्रतिस्पर्धी संघांनी काळजी करावी,” ते म्हणाले.
कर्णधारपदाच्या वादानंतर विराट कोहलीची देहबोली बदलली आहे का, असे विचारले असता शास्त्री म्हणाले: “मी म्हटल्याप्रमाणे, मी मालिकेत एकही चेंडू फॉलो केलेला नाही. पण विराट कोहलीत फारसा बदल होईल असे मला वाटत नाही.” नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये तीनही सामने गमावले आणि पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेतून विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील असेल. 6 फेब्रुवारीपासून दोन्ही संघात तीन वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2022 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

