IND vs ENG 2021: लॉर्ड्सवर टीम इंडियाने दाखवला दम, पण ‘या’ 3 कमतरता सुधारल्या नाहीत तर हातून निसटणार मालिका

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर ‘विराटसेने’ने माजी मारली आणि रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने यजमान ब्रिटिश संघाचा 151 धावांनी पराभव केला. तथापि लॉर्ड्स कसोटीत केलेल्या चुका भारतीय संघाला सुधारण्याची गरज आहे कारण असे न केल्या इंग्लंडविरुद्ध मालिका हातून निसटेल.

IND vs ENG 2021: लॉर्ड्सवर टीम इंडियाने दाखवला दम, पण ‘या’ 3 कमतरता सुधारल्या नाहीत तर हातून निसटणार मालिका
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यादरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स मैदानावर (Lords Ground) ‘विराटसेने’ने माजी मारली आणि रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) यजमान ब्रिटिश संघाचा 151 धावांनी पराभव केला. संघासाठी वेगवान गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यात चांगली आक्रमक गोलंदाजी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा निभावला. दुसऱ्या कसोटी सामन्यात 27 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) दोन्ही डावांमध्ये जास्तीत जास्त आठ विकेट्स काढल्या. याशिवाय इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनीही आपल्या उत्तम गोलंदाजीने लोकांना प्रभावित केले. तथापि लॉर्ड्स कसोटीत केलेल्या चुका भारतीय संघाला सुधारण्याची गरज आहे कारण असे न केल्या इंग्लंडविरुद्ध मालिका हातून निसटेल. (IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात बदल, 3 वर्षानंतर स्फोटक फलंदाजाचे पुनरागमन; भारतासाठी ठरू शकतो धोकादायक)

कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म

भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लॉर्ड्स कसोटीतही धावांसाठी संघर्ष करत आहे. कोहलीला दोन्ही डावांमध्ये चांगली सुरुवात मिळाली, पण तो मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात 103 चेंडूंचा सामना करताना त्याने तीन चौकारांसह 42 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने 42 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याला अवघ्या 20 धावाच करता आल्या. अशा परिस्थितीत कर्णधार कोहलीचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय राहिला आहे.

मधल्या फळीचा संघर्ष

भारतासाठी, आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सलामीवीरांनी संयमी सुरुवात केली आहे, पण मधल्या फळीच्या अपयशामुळे भारतीय संघ मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरला आहे. लॉर्ड्स कसोटीचा दुसरा डाव वगळता चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार रहाणे यांचा फॉर्म गेल्या अनेक सामन्यांसाठी चिंतेचे कारण ठरला आहे. तसेच रिषभ पंतला इंग्लंडमध्ये आतापर्यंत विशेष कामगिरी करता आलेली नाही.

रूटचा फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी

विरोधी संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) श्रीलंका दौऱ्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मालिकेत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतके केली आहे. इंग्लंडचे इतर फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणापुढे गुडघे टेकताना दिसले, तर रूटने मैदानात जोरदार फलंदाजी केली. परिस्थिती अशी आहे की भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम प्रयत्न करूनही त्याला रोखण्यात अपयश आले आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला रूटविरुद्ध काही महत्त्वाची रणनीती करावी लागेल जेणेकरून तो त्याला लवकरात लवकर पॅव्हिलियनमध्ये जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2021 10:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).