Team India (Photo Credit - X)

ICC T20 World Cup 2024: सुपर-8 च्या ब गटातून इंग्लंड (England) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. मात्र अ गटातील उपांत्य फेरीतील संघ अद्याप समोर आलेला नाही. भारत सध्या अ गटात अव्वल स्थानावर आहे, पण गणित मांडले तर या गटातील सर्व संघांना उपांत्य फेरीत जाण्याची अजूनही संधी आहे. पण टीम इंडियाला (Team India) टॉप-4 मध्ये जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे कारण त्याचे 4 गुण आहेत आणि निव्वळ रन-रेट +2.425 आहे. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीत गेल्यास भारताचा सामना कोणत्या संघाशी होऊ शकतो हे जाणून घेऊया. (हे देखील वाचा: IND vs AUS Weather Update: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी सेंट लुसियामध्ये मुसळधार पाऊस, सामना रद्द झाल्यास कोणाचे होणार नुकसान? घ्या जाणून)

उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी होणार?

वेळापत्रकानुसार पाहिल्यास, सुपर-8 च्या अ गटातील पहिल्या संघाचा सामना ब गटातील दुसऱ्या संघाशी होईल. ब गटातील अव्वल संघाचा सामना पहिल्या गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी होईल. सुपर-8 मधील शेवटच्या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून हरली, तरीही ते कदाचित अव्वल स्थानावर राहतीस. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान जास्तीत जास्त 4 गुण मिळवू शकतात, परंतु भारताच्या निव्वळ धावगतीच्या पलीकडे जाणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. याचा अर्थ, जर भारत अ गटात अव्वल राहिला तर त्याचा सामना ब गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडशी होईल. जर टीम इंडिया अ गटात दुसऱ्या स्थानावर घसरली तर त्याचा सामना ब गटातील अव्वल संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होईल.

इंग्लंड आहे गतविजेता 

2022 मध्ये इंग्लंडने टी-20 विश्वचषक जिंकला होता. गतविजेतेपदाचे दडपण असतानाही इंग्लंडने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात यूएसएचा 10 गडी राखून पराभव केल्यावर जोस बटलर आणि त्याचे खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले असतील. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी झाला तर टीम इंडियाला विजयाची नोंद करणे सोपे जाणार नाही.