पुलेला गोपीचंद यांनी सायना नेहवालने अकादमी सोडल्यानंतरच्या कठीण काळाबद्दल केला मोठा खुलासा, प्रकाश पादुकोण यांच्यावर केला मोठा आरोप
पुलेला गोपीचंद (Photo Credit: PTI)

नॅशनल बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद (Pullela Gopichand) यांनी आपल्या 'ड्रीम्स ऑफ अ बिलियन: इंडिया अँड ऑलिम्पिक गेम्स' या पुस्तकात सायना नेहवाल (Saina Nehwal) ने गोपीचंद अकादमी सोडल्याबद्दल जाणवलेल्या दु:खाचा अनुभव प्रशिक्षकांसमोर व्यक्त केला. गोपीचंद यांनी पुस्तकातील 'बिटर रिव्हलरी' म्हणून लिहिलेल्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. गोपीचंद यांनी आपल्या आगामी पुस्तकात आपल्या आयुष्यातील बर्‍याच चांगल्या आणि कठीण क्षणांचा उल्लेख केला आहे. 2014 वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर सायनाने माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण (Prakash Padukone) च्या अकादमीमध्ये विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचे आणि बेंगळुरू येथे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले तेव्हा ते किती दु:खी होते हे गोपीचंद यांनी उघड केले. सायनाचे पती आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यप यानेही याची पुष्टी केली आहे. भारताचा पहिला बॅडमिंटन सुपरस्टार 'पादुकोण' त्यांच्याविषयी म्हणायला कधीच सकारात्मक का नव्हते, असा प्रश्नही गोपीचंद यांना पडला.

2014 वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर सायनाच्या बंगळुरू येथे विमल कुमारच्या नेतृत्वात पादुकोणच्या अ‍ॅकॅडमी (Padukone Academy) मध्ये रुजू होण्याच्या निर्णयाची माहिती 'बिटर रिव्हलरी' (Bitter Rivalry) या पुस्तकाच्या गोपीचंदने दिली. गोपीचंद यांनी पुस्तकात लिहिले, "हे असे होते की माझ्या जवळच्या व्यक्तीला माझ्यापासून दूर नेले गेले. यापूर्वी मी सायनाला न जाण्याची विनंती केली होती. पण तो वर तिने दुसर्‍या एखाद्याच्या प्रभावाखाली येत आपला निर्णय घेतला होता. मला त्याची प्रगती थांबवायची नव्हती. म्हणूनच मी तिला थांबवले नाही. हे आपल्यापैकी दोघांसाठीही फायदेशीर नाही."

दुसरीकडे, त्यावेळी अशा अफवा देखील पसरल्या की गोपीचंद तिच्यापेक्षा पीव्ही सिंधूकडे जास्त लक्ष देत असल्याने सायना नाराज होती. यावर गोपीचंदने पुस्तकात लिहिले, "होय, माझे इतर खेळाडूही होते आणि 2012 ते 2014 दरम्यान सिंधूच्या खेळामध्ये बर्‍यापैकी सुधार झाला. पण सायनाकडे दुर्लक्ष करण्याची माझी इच्छा नव्हती. कदाचित मी तिला हे समजावून सांगू शकलो नाही. पण प्रकाश पादुकोण, प्रशिक्षक विमल कुमार आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे अधिकारी वीरन रास्किना यांच्या भूमिकेमुळे मला अधिक वाईट वाटले." गोपीचंद पुढे म्हणाले की,"त्यांनी नेहमीच पादुकोण यांना आदर्श मानला असला तरीही त्यांनी त्यांच्याबद्दल काही चांगले का बोलले नाही हे त्यांच्यासाठी अजूनही एक रहस्य आहे. हार्पर कॉलिन्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून 20 जानेवारीपासून उपलब्ध होईल.