ICC T20 विश्वचषक 2021 च्या 37 व्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) स्कॉटलंडचा (Scotland) 8 गडी राखून सहज पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा नायक रवींद्र जडेजासोबत (Ravindra Jadeja) पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान एक मजेदार घटना घडली. पत्रकाराने जडेजाला प्रश्न विचारला, “सध्या अशा गोष्टी सुरू आहेत की, जर न्यूझीलंड  (New Zealand) अफगाणिस्तानकडून हरला, तर सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता कमी होईल. पण न्यूझीलंड हरला नाही तर तुम्ही काय कराल? पत्रकाराने पुन्हा आपला प्रश्न विचारला ज्याच्या उत्तरात जडेजा म्हणतो, “अजून काय? आम्ही बॅग बांधून घरी जाऊ?”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)