टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला जात आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चौथ्या T20I सामन्यात दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरोपेक्षा कमी नाही. कारण आज भारतीय संघ हरला तर पाच सामन्यांची मालिका गमावेल. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 17/2.
5TH T20I. WICKET! 2.5: Shubman Gill 9(9) lbw Akeal Hosein, India 17/2 https://t.co/YzoQnY7mft #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)