उद्योगमंत्री राजीनामा देणार का? 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर Aaditya Thackeray यांच्याकडून टीका
गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत?
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले होते. आता टाटा आणि एअरबस या कंपनीचा प्रोजेक्टही गुजरातच्या बडोद्याला गेला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दावा केला आहे की, सध्याच्या सरकारमुळे असे 4 प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, 'टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का?'
खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का? #खोकेसरकार_खोटेसरकार#महाराष्ट्रातल्या_युवकांना_न्यायहवा#SaveMaharashtraYouth#JobsForMaharashtra#प्रोजेक्ट_उडालाभूर्र
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2022 10:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

