मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर, 24 एप्रिल 2025 रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. यासह आणखी एका विमानाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एअर इंडियाचे हे विमान 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईत येईल. अशाप्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य शासन करणार आहे, असे एक्सच्या सीएमओ महाराष्ट्र या हॅण्डलवर नमूद करण्यात आले आहे. यासह जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या पार्थिवांची व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठी, महाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi On Pahalgam Terror Attack: 'दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केला निर्धार)
Pahalgam Terror Attack:
#जम्मूकाश्मीर मधील महाराष्ट्राच्या नागरिकांच्या परतीसाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. एअर इंडियाचे हे विमान १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईत येईल. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या निर्देशानंतर आज २ विशेष विमाने मुंबईत येणार आहेत.#Pahalgam#PahalgamTerrorAttack pic.twitter.com/8hqvWtqjSY
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 24, 2025
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर उद्या २४ एप्रिलला श्रीनगर येथून मुंबईसाठी इंडिगोचे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे. pic.twitter.com/FFaLADVWTF
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 23, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)