Mumbai Police: मुंबई येथील वरळी परिसरात एकाची हत्या, तिघांना अटक

मुंबई शहरातील वरळी परिसरात एका 42 वर्षीय व्यक्तीस लाठ्या-काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजन दास असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. झालेल्या जबर मारहाणीत राजन दास याचा मृत्यू झाला आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणात सचिन कवंदर, सदा कवंदर आणि भावेश साळवे या तीन आरोपींना अटक केली आहे.

Mumbai Police: मुंबई येथील वरळी परिसरात एकाची हत्या, तिघांना अटक
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

मुंबई शहरातील वरळी परिसरात एका 42 वर्षीय व्यक्तीस लाठ्या-काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजन दास असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. झालेल्या जबर मारहाणीत राजन दास याचा मृत्यू झाला आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणात सचिन कवंदर, सदा कवंदर आणि भावेश साळवे या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पीडितासोबत असलेल्या पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे. सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2023 08:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).