Maharashtra Rains: राज्यात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू, 76 हून अधिक जखमी
येत्या 24 तासांत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस चालू आहेत. भारतीय हवामान विभागाने या आठवड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 24 तासांत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. अशात राज्यात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये जूनपासून आतापर्यंत एकूण 49 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 76 हून अधिक जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागाने दिलेल्या अहवालात ही आकडेवारी नमूद केली आहे. (हेही वाचा: Irshalwadi Landslide: रायगड मधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात वाढ; एकूण 13 जण दगावले)
राज्यात पावसामुळं झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये जूनपासून आतापर्यंत एकूण ४९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ७६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागानं दिलेल्या अहवालात ही आकडेवारी नमूद केली आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2023 07:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

