Illegal Bangladeshi Immigrants: बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे केंद्राचे महाराष्ट्राला निर्देश; Saif Ali Khan वरील हल्ल्यानंतर वाढला राजकीय व सामाजिक दबाव
शिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती.
केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला राज्यातील अवैध बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली येथून महाराष्ट्राच्या गृहविभागाला पाठवलेल्या अधिकृत पत्राद्वारे हे निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला अनुसरून गृहमंत्रालयाने राज्य सरकारला कायदेशीर उपाययोजनांसाठी निर्देश दिले आहेत. शिवाय, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (TISS) तयार केलेल्या अहवालाच्या आधारे हा मुद्दा अधिक गांभीर्याने घेतला गेला आहे.
नुकतेच 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानवर एका बांगलादेशी घुसखोराने चाकूने सहा वार केले होते. मोहम्मद शहजाद या अवैध घुसखोराला 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आणि तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेनंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. शिवसेना (UBT), काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले. आता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर वाढलेल्या राजकीय आणि सामाजिक दबावामुळे केंद्र आणि राज्य सरकार या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत आहेत. गृहमंत्रालयाचे आदेश आणि तपासणीसाठी ठोस उपाययोजना केल्याने बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हाताळण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: Milind Deora on Illegal Bangladeshi Immigrants: 'बेकायदेशीरपणे मुंबईत राहणार्या बांग्लादेशींना ताबडतोब बाहेर काढा' शिवसेना खासदार Milind Deora यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी)
बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे केंद्राचे महाराष्ट्राला निर्देश-
Union Home Ministry has directed Maharashtra government to take strict action against illegal Bangladeshi immigrants. The letter has been written by the Union Home Ministry in Delhi to the officials in Maharashtra's Home Department. Ministry has written this letter after former…
— ANI (@ANI) January 22, 2025
#WATCH | Mumbai On action being taken against Bangladeshis in the Nalasopara Area, Pournima Chougule Shringi, DCP Zone 2 says "If the citizen of any country is staying illegally, it is a crime. Bangladeshis come here in large numbers, stay illegally and also indulge in criminal… pic.twitter.com/2xsuAZGhw0
— ANI (@ANI) January 22, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2025 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

