AI Policy 2025 In Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच एआय धोरण लागू करण्यात येणार; शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांच्या समितीची स्थापन
महाराष्ट्र सरकारने एआय धोरण 2025 वर शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
AI Policy 2025 In Maharashtra: महाराष्ट्रात लवकरच एआय धोरण लागू करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यांसदर्भात शुक्रवारी माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने एआय धोरण 2025 वर शिफारसी सादर करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. याबाबत माहिती देताना आशिष शेलार यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या आयटी मंत्रालयाने एआय पॉलिसी टास्कफोर्सची स्थापना जाहीर करताना आनंद होत आहे, ज्यामुळे एआय आधारित उद्योगाच्या जलद वाढीचा फायदा घेण्यासाठी एआय धोरण 2025 विकसित करण्यास महाराष्ट्राला मदत होईल.
महाराष्ट्रात एआय पॉलिसी लागू होणार -
Maharashtra to become India's 1st state to have a dedicated AI Policy !
As part of CM @Dev_Fadnavis ji led BJP/SS/NCP Govt 100 day action,
Pleased to announce the formation of AI Policy Taskforce by my IT Ministry, to help Maharashtra to develop AI Policy 2025 to capitalise on… pic.twitter.com/yGgy7xe50t
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 17, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2025 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

