'अनिल देशमुख नक्की कुठे आहेत माहित नाही, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास आम्ही असमर्थ आहोत'- ED

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) चार वेळा समन्स बजावूनही अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर झाले नाहीत. या प्रकरणात, आता अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे की, 'आम्ही अनिल देशमुख यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास असमर्थ आहोत. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही

'अनिल देशमुख नक्की कुठे आहेत माहित नाही, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास आम्ही असमर्थ आहोत'- ED
Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) चार वेळा समन्स बजावूनही अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर झाले नाहीत. या प्रकरणात, आता अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे की, 'आम्ही अनिल देशमुख यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास असमर्थ आहोत. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आम्हाला आशा आहे की आजच्या आदेशानंतर ते आम्हाला तपासात सहकार्य करतील.' अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

तपास यंत्रणेने पुढे सांगितले की, 'आम्हाला आशा आहे की आजच्या आदेशानंतर ते तपासात सहकार्य करतील. मनी लाँडरिंग चौकशीच्या संदर्भात देशमुख काल एजन्सीसमोर हजर झाले नाहीत. राष्ट्रवादीचे नेते, त्यांचे वकील इंद्रपाल सिंह यांच्यामार्फत ईडीला दोन पानांचे पत्र पाठवून त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवत असल्याचे सांगितले. चौकशी एजन्सीने शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांना सोमवारी दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नवीन समन्स जारी केले. देशमुख यापूर्वीही तीन वेळा ईडीसमोर हजर झाले नाहीत.

याआधी देशमुख यांनी कोरोना महामारी आणि वाढत्या वयाचे कारण दिले होते. त्यांच्या वकिलांनी पाठवलेल्या पत्रात अनिल देशमुख म्हणाले की, त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 30 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने 3 ऑगस्टची तारीख देताच ईडीने सोमवारसाठी समन्स जारी केले आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून संरक्षण मिळावे याबाबतच्या देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे. (हेही वाचा: MVA Government on Governor: आपण मुख्यमंत्री नाही हे राज्यपालांनी समजून घ्यावे- महाविकासआघाडी सरकार)

दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे भारतातच असून लवकरच ते निर्दोष सिद्ध होतील,असा विश्वास वाटत असल्याचं मलिक म्हणाले आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर लाचखोरीचे आरोप लावल्यानंतर देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. गेल्या महिन्यात, तपास संस्थेने देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2021 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).