Vishalgadh Fort: 'पावसाळ्यात विशाळगड किल्ल्याभोवती कोणतीही रचना पाडली जाणार नाही याची खात्री करा'; हायकोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार विशाळगड किल्ला परिसरातील कोणत्याही व्यक्तीची निवासी जागा पावसाळ्यात पाडले जाणार नाहीत, अशी ग्वाही सरकारी वकील पी.पी. काकडे यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने 14 जुलै रोजी परिसरात झालेल्या हिंसाचाराबद्दलही चिंता व्यक्त केली.

Vishalgadh Fort: 'पावसाळ्यात विशाळगड किल्ल्याभोवती कोणतीही रचना पाडली जाणार नाही याची खात्री करा'; हायकोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश
Bombay High Court | (Photo Credits: ANI)

विशालगडावरील (Vishalgadh Fort) अतिक्रमणविरोधी मोहिमेला हिंसक वळण लागल्याच्या काही दिवसांनंतर, पावसाळ्यात कोल्हापुरातील विशाळगड किल्ल्याभोवती कोणतीही इमारत पाडली जाणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना दिले. याआधी 14 जुलै रोजी किल्ल्यावरील अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि मालमत्तेचे नुकसान केले, ज्यामुळे 500 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि 21 जणांना अटक करण्यात आली.

पुण्याहून आलेल्या काही उजव्या समर्थकांना प्रतिबंधात्मक आदेशाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्याच्या पायथ्याशी थांबवण्यात आल्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला. आता    न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि फिरदोश पूनीवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, शुक्रवारपासून विशाळगड किल्ला परिसरात कोणतीही निवासी किंवा व्यावसायिक इमारत पाडली गेल्यास ते अधिका-यांवर भारी पडेल.

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार विशाळगड किल्ला परिसरातील कोणत्याही व्यक्तीची निवासी जागा पावसाळ्यात पाडले जाणार नाहीत, अशी ग्वाही सरकारी वकील पी.पी. काकडे यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने 14 जुलै रोजी परिसरात झालेल्या हिंसाचाराबद्दलही चिंता व्यक्त केली. उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित हिंसाचाराच्या चौकशीसाठी, उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची विनंती करणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील काही रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. (हेही वाचा; Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभेसाठी कॉंग्रेस 20 ऑगस्टपासून करणार निवडणूक प्रचाराला सुरुवात; जागावाटपाबद्दल चर्चा सुरु)

याचिकाकर्त्यांतर्फे अधिवक्ता एसबी तळेकर यांनी खंडपीठाला कथित हिंसाचाराचा व्हिडिओ दाखवला. याचिकेनुसार, 'उजव्या' कार्यकर्त्यांना विशाळगडावर प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने किल्ल्याच्या पायथ्याशी पोलीस तैनात केले होते, जेणेकरुन किल्ल्याच्या आवारातील मुस्लिम रहिवाशांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण होईल. निषिद्ध आदेश असूनही, पोलिसांनी किमान 100 आंदोलकांना किल्ल्यावर चढण्यास परवानगी दिली, ज्यामुळे जवळपास दोन तास गावात अराजकतेचे वातावरण होते, असा आरोप त्यात करण्यात आला आहे. 1660 मध्ये पन्हाळा किल्ल्यावर वेढा घातल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तिथून निसटून विशाळगडाकडे पळून गेल्यामुळे या किल्ल्याला मराठा इतिहासात खूप महत्त्व आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2024 11:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).