GST परतावा द्या म्हणत शिवसेनेचा केंद्र सरकारवर 'सामना' च्या अग्रलेखातून हल्लाबोल
शिवसेनेने देशाची आर्थिक स्थिती आणि जीएसटी वरुन मोदी सरकारवर सामाना मधील अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला आहे. तर अग्रलेखातून असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे देशात अराजक निर्माण झाली आहे आणि त्याचा फटका राज्यांना बसला आहे.
शिवसेनेने देशाची आर्थिक स्थिती आणि जीएसटी वरुन मोदी सरकारवर सामाना मधील अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला आहे. तर अग्रलेखातून असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे देशात अराजक निर्माण झाली आहे आणि त्याचा फटका राज्यांना बसला आहे. जीएसटी लागू करताना आम्ही ज्या धोक्यांची घंटा सतत वाजवत होते ते सर्व धोके आता समोर ठाकले असून केंद्र सरकार यावर थातूरमातूर उत्तरे देत पळ काढत आहेत.
जीएसटीवरुन राज्यांच्या उत्पादनात मोठा घाटा केंद्र सरकारकडून भरुन देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारकडून राज्यांना 50 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यास असमर्थता व्यक्त केली. एवढेच नाही तर त्यांचे गेल्या चार महिन्यांपासून जीएसटी परताव्याची रक्कम सुद्धा दिलेली नाही. है पैसे राज्यांच्या हक्काचे असल्याने राज्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी ही एक क्रांतिकारक आर्थिक योजना असल्याचा डांगोरा पिटला होता असल्याचे ही अग्रलेखातून म्हटले आहे.('कुछ लोगों की आंखों में, खटकने का भी मजा होता है' म्हणत संजय राऊत यांची ट्विट मालिका कायम)
(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2019 11:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

