Abu Azmi (फोटो सौजन्य - ANI)

Abu Azmi Letter to Assembly Speaker: समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाची स्तुती केली होती. यानंतर ते वादात सापडले होते. त्यानंतर त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. आता त्यांनी सभापतींना पत्र लिहून त्यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे.

अबू आझमी यांनी पत्रात लिहिले आहे की, 3 मार्च रोजी सभागृहातून बाहेर काढल्यानंतर मीडियाच्या लोकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची तुलना राहुल गांधींशी केल्याबद्दल माध्यमांनी त्यांना औरंगजेबाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, औरंगजेबाच्या कारकिर्दीने आकर्षित होऊन इंग्रज भारतात आले. (हेही वाचा - SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या विधानाबद्दल अबू आझमींवर कारवाई; संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित)

अबू आझमी यांचे स्पष्टीकरण -

आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना अबू आझमी यांनी म्हटलं की, 'मी इतिहासाचा संदर्भ दिला आणि म्हटले की औरंगजेब हा एक महान प्रशंसक होता. औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माचा कोणताही संघर्ष नव्हता. तो सत्तेसाठीचा लढा होता. तो जमिनीसाठीचा लढा होता. मी जात आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. माझ्या विधानावरून हे स्पष्ट होते की मी जे काही बोललो ते इतिहासाच्या संदर्भात बोललो होतो. मी कुठेही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. माझे विधान माध्यमांमध्ये चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले, म्हणूनच मी माझे निलंबन मागे घेण्याची विनंती करतो.' (हेही वाचा: SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: 'अबू आझमींनी भाजपला मदत करण्यासाठी हे विधान केले होते का?'; आमदार Rohit Pawar यांनी औरंगजेबावरील टिप्पणीबाबत उपस्थित केले प्रश्न)

मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक केल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आलेले समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार अबू असीम आझमी यांना 100 टक्के तुरुंगात पाठवले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले होते. औरंगजेबाचे कौतुक करणे हे मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे योद्धा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.