Murder

Maharashtra: एका इंस्टाग्राम स्टोरीवरून महाराष्ट्रात एका 17 वर्षीय मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरातील पिंपळगाव गावातील हि घटना असल्याचे समोर आले आहे. एका इंस्टाग्राम पोस्टवरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. महिनाभरापूर्वी, पीडित, हिमांशू आणि आरोपी, मानव जुमनाके (21) यांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक  स्टोरी टाकली होती, असे हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने ऑनलाइन पोस्टवर अधिक तपशील न देता सांगितले. पीडित हिमांशूला आरोपींपेक्षा जास्त मते मिळाली आणि यावरून दोघांमध्ये वाद झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेला आरोपीपेक्षा जास्त मते मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला. या मुद्द्यावर शनिवारी दोघांची भेट झाली, मात्र त्यांच्यात शाब्दिक वाद झाला, वाद इतका वाढत गेला कि, आरोपीने पिडीतेची हत्या केली, आरोपीला अटक करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. हेही वाचा: Heart Attack While Dancing: मध्य प्रदेशात लग्न समारंभात डान्स करताना 23 वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)

यानंतर आरोपींनी हिमांशूसह त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला केला, असे हिंगणघाट पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. हल्ल्यानंतर हिमांशूचा मृत्यू झाला, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.