Aaditya Thackeray Kolhapur Visit: शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे 1 ऑगस्टला कोल्हापूरच्या दौऱ्यावर; घेणार जाहीर सभा
शिंदे आणि पक्षाच्या इतर आमदारांनी सत्तापालट केल्यानंतर पक्षात राहिलेले शिवसेना समर्थक आणि कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे संपर्क साधत आहेत. आदित्य यांनी आधीच जाहीर केले आहे की ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांना नियमित भेट देतील आणि त्यांच्या पराभवासाठी पक्षाची पुनर्बांधणी करतील.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आहे. या दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार व खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. आता शिवसेनेमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करण्यासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रेची (Shiv Samvad Yatra) सुरुवात केली आहे. शिवसंवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर युवासेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या टप्प्यात 1 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा घेणार आहेत.
आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा महत्त्वाचा आहे कारण, इथले शिवसेनेचे दोन खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर आणि अपक्ष आमदार व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर तसेच महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पक्ष सोडून शिंदे कॅम्पमध्ये प्रवेश केला आहे. शिंदे यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी दोन खासदार आणि आमदारांनी ज्या पद्धतीने दुसऱ्या जहाजात उडी मारली, ते पाहून आदित्य आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खचितच दुःख झाले पा, म्हणूनच त्यांनी कोल्हापूरची निवड केली.
याआधी दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढून शिंदे आणि इतर आमदारांवर हल्लाबोल केला होता. शिवाय, 10 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा पराभव ठाकरेंना अद्याप पचवता आलेला नाही. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय मंडलिक यांच्याकडून पवारांचा पराभव झाल्याने ते निराश झाले होते. (हेही वाचा: सीएम एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रिमंडळ बैठक, दोघांनीच घेतले अनेक निर्णय)
आता शिंदे आणि पक्षाच्या इतर आमदारांनी सत्तापालट केल्यानंतर पक्षात राहिलेले शिवसेना समर्थक आणि कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे संपर्क साधत आहेत. आदित्य यांनी आधीच जाहीर केले आहे की ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांना नियमित भेट देतील आणि त्यांच्या पराभवासाठी पक्षाची पुनर्बांधणी करतील. बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन नव्याने निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2022 08:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

