Mumbai: रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे दिल्लीतून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीची तिच्या कुटूंबियासोबत भेट घडली
शिक्षण घेण्याच्या पालकांच्या दबावामुळे घर सोडून गेलेली 14 वर्षीय तरुणी महाराष्ट्रातील (Maharashtra) ऑटोरिक्षा चालकाच्या (Autorickshaw driver) मदतीने तिच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र येऊ शकली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.
शिक्षण घेण्याच्या पालकांच्या दबावामुळे घर सोडून गेलेली 14 वर्षीय तरुणी महाराष्ट्रातील (Maharashtra) ऑटोरिक्षा चालकाच्या (Autorickshaw driver) मदतीने तिच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र येऊ शकली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. माणिकपूर पोलीस ठाण्याचे (Manikpur Police Station) वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब के अहिर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ऑटोरिक्षा चालक राजू करवाडे वसई स्थानकाच्या बाहेर प्रवाशांची वाट पाहत असताना एका मुलीने त्याच्याजवळ येऊन विचारले की या परिसरात खोली मिळेल. संशयास्पद वाटल्याने चालकाने मुलीचे ओळखपत्र पाहिले आणि तिची चौकशी केली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
तरुणीने ऑटोरिक्षा चालकाला सांगितले की, ती नवी दिल्लीची असून येथे एकटीच आली आहे. ऑटो रिक्षाचालकाने तात्काळ वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला कळवले आणि त्यानंतर मुलीला माणिकपूर पोलिस ठाण्यात नेले. मुलीने पोलिसांना सांगितले की ती नवी दिल्लीतील पुष्प विहार येथील असून तिची आई तिच्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दबाव आणत असल्याने शुक्रवारी घरातून पळून गेली होती. हेही वाचा Murder: पुण्यामध्ये घरगुती वादातून सासूची हत्या, आरोपीला बेड्या
पालघर पोलिसांनी दिल्लीच्या साकेत पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. जिथे मुलीच्या पालकांनी आधीच अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांना तिचा ठावठिकाणा कळवला. यानंतर मुलीचे पालक विमानाने वसईला पोहोचले, तिथे शनिवारी संध्याकाळी उशिरा ते आपल्या मुलीला भेटू शकले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याचबरोबर रिक्षाचालकाच्या सतर्कतेबद्दल आणि समजूतदारपणाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2022 06:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

