Farmers Die By Suicide In Chandrapur: चंद्रपूरमध्ये जानेवारी ते जुलै 2023 पर्यंत 73 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
गेल्या महिन्यात 13 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची आकडेवारी जाहीर केली आहे. 2001 ते 2023 पर्यंत जिल्ह्यात 1,148 शेतकर्यांनी आपले जीवन संपवले आहे. ज्यात गेल्या पाच वर्षात 446 शेतकर्यांचा समावेश आहे.
Farmers Die By Suicide In Chandrapur: महाराष्ट्रातील चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत तब्बल 73 शेतकऱ्यांनी (Farmers) आत्महत्या (Suicide) केल्या आहेत, त्यात गेल्या महिन्यात 13 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची आकडेवारी जाहीर केली आहे. 2001 ते 2023 पर्यंत जिल्ह्यात 1,148 शेतकर्यांनी आपले जीवन संपवले आहे. ज्यात गेल्या पाच वर्षात 446 शेतकर्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचा समावेश असलेल्या समितीने 2001 ते 2022 या कालावधीत आत्महत्या केलेल्या 745 शेतकर्यांना शासकीय नुकसान भरपाईसाठी तर 329 मयत शेतकर्यांना अपात्र घोषित केले होते, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून डिसेंबर 2022 पासून 48 प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये भरपाईची रक्कम देण्यासाठी 2006 मध्ये अद्यतनित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत. (हेही वाचा - Ahmednagar News: दलित तरुणांचे कपडे काढून झाडाला टांगून मारहाण, अहमदनगर येथील संतापजनक घटना)
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत सरकार निश्चित निकषांवर आधारित नुकसान भरपाई देते. पीक नुकसान, राष्ट्रीयीकृत बँका/सहकारी बँका किंवा मान्यताप्राप्त सावकारांकडून कर्जाची परतफेड करण्यास असमर्थता आणि कर्जाची परतफेड करण्यात अपयशी अशा कारणांसाठी, शेतकर्यांचे नातेवाईक 1 लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र असतील. त्यापैकी 30,000 रु. त्यांना सुपूर्द करण्यात येईल, तर उर्वरित 70,000 रुपये 2006 मध्ये जारी केलेल्या शासन निर्णयानुसार पाच वर्षांसाठी त्यांच्या खात्यात जमा केले जातील.
यावर्षी जून-जुलैमध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 64,379 शेतकऱ्यांच्या एकूण 54,514.65 हेक्टरवरील पिकांचे नुकतेच नुकसान झाले, अशी माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील एकूण 852 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.गोंडपिपरी तहसीलमध्ये सर्वाधिक 12571 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
विभागाने यापूर्वीच जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीसाठी 44.63 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत एकूण 3,51,091 शेतकर्यांनी 1 रुपये (प्रिमियम) पीक विमा काढला आहे, ज्यात कर्ज घेतलेल्या 50,890 शेतकर्यांचा आणि 3,00,201 बिगर कर्जदार शेतकर्यांचा समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2023 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

