JNU Violence: JNU मध्ये पुन्हा राडा, काही विद्यार्थी जखमी
Representational Image | Jawaharlal Nehru University (Photo Credits: ANI)

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP आणि AISA आणि SFI या डाव्या आघाडीच्या सदस्यांमध्ये झालेल्या हाणामारीत बरेच विद्यार्थी जखमी झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास ही हाणामारी झाली. चर्चासत्राच्या आयोजनावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर हिंसक वळण लागले. पोलिस उपायुक्त गौरव शर्मा म्हणाले की, त्यांना दोन्ही बाजूंकडून तक्रारी आल्या आहेत आणि सध्या ते या घटनेचा तपास करत आहेत. ते म्हणाले, "आम्ही लवकरच या प्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवणार आहोत." जखमी विद्यार्थ्यांची फोटो शेअर करताना, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षा 'आयशी घोष' यांनी ABVP सदस्यांवर आणि विद्यार्थ्यांवर हिंसाचार घडवून आणल्याचा आणि कॅम्पसमधील लोकशाहीला वेळोवेळी बाधा आणण्याचा आरोप केला आहे.

सूत्रांनी (IANS) सांगितले की, काही जखमी विद्यार्थ्यांना (AIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. "जेएनयू प्रशासन अजूनही गप्प बसेल का? गुंडांवर कारवाई होणार नाही का?," घोष यांनी ट्विटरवर प्रश्न केला. दुसरीकडे, उजव्या विंग ABVP डाव्या विद्यार्थी पक्षांवर  AISA आणि SFI वर उलट आरोप केले. जेएनयूमध्ये ABVP कार्यकर्त्यांच्या शांततापूर्ण सभेवर डाव्या पक्षांनी हिंसक हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला. "या हल्ल्यात एका एमएच्या विद्यार्थ्याचे बोट मोडले गेले, एका दिव्यांग विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आणि ABVPच्या विविध कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली," असे पक्षाने म्हटले आहे. (हे ही वाचा Odisha: ओडिशातील 63 वर्षीय महिलेने आपली संपत्ती रिक्षाचालकाला केली दान.)

ABVPने हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या एका सदस्याने सांगितले, "त्यांनी हे वेळोवेळी जेएनयू कॅम्पसची शांतता नष्ट केली आहे.