Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या 4 महिन्यांसाठी नव्या जिल्ह्याची निर्मिती; 4 तहसील, 67 गावांचा समावेश

चार तहसील क्षेत्रातील 67 गावांना जोडून या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. या तात्पुरत्या जिल्ह्यातील प्रशासन सामान्य जिल्ह्यांप्रमाणेच काम करेल.

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या 4 महिन्यांसाठी नव्या जिल्ह्याची निर्मिती; 4 तहसील, 67 गावांचा समावेश
Photo Credit- X

Maha Kumbh Mela 2025:  उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) महाकुंभ-2025 ची तयारी जोरात सुरू आहे. महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधांची काळजी घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी योगी सरकारने रविवारी तात्पुरत्या जिल्ह्याची स्थापना केली. त्याला महाकुंभ मेळा (Maha Kumbh Mela 2025) असे नाव देण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीन जिल्ह्यात तात्पुरती पोलीस ठाणे व पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला रविवारी नवीन तात्पुरता जिल्हा घोषित करण्यात आला. केवळ चार महिन्यांसाठी, म्हणजे महाकुंभाच्या पूर्वतयारीपासून ते जत्रा सुरक्षितपणे पूर्ण होईपर्यंत हा जिल्हा कायम राहील, त्यानंतर त्याचे वर्चस्व आपोआप संपेल. या तात्पुरत्या जिल्ह्यासाठी अधिसूचना जारी करताना, प्रयागराजचे डीएम रवींद्र कुमार मंदार म्हणाले की ते संपूर्ण जिल्ह्याप्रमाणे कार्य करेल. यामध्ये डीएम, एसएसपीसह सर्व विभागांची पदे निर्माण करण्यात आली आहेत.(Kumbh Mela 2025: पुढील वर्षी प्रयागराजमध्ये भरणार महाकुंभ मेळा; जाणून घ्या महत्व, तारखा व शाही स्नानाच्या तिथी)

4 तालुक्यांतील 67 गावांचा नव्या जिल्ह्यात समावेश

प्रयागराजच्या तहसील सदर, सोराव, फुलपूर आणि करचना या जिल्ह्यांचा महाकुंभमेळ्यात समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण परेड परिसर आणि या 4 तालुक्यांतील 67 गावांचा महाकुंभमेळ्यात समावेश करण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार, तहसील सदरची 25 गावे, तहसील सोरांवची तीन गावे, तहसील फुलपूरची 20 गावे आणि करचना तहसीलची 19 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

तात्पुरता जिल्हा कसा तयार होतो?

राज्य सरकारांना जिल्हे निर्माण करण्याचा अधिकार आहे. नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी शासनाला अधिकृत राजपत्रात अधिसूचना जारी करावी लागेल. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यकारी आदेश देऊ शकतात किंवा विधानसभेत कायदा करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करता येईल. याशिवाय राज्य सरकार जिल्ह्याचे नाव बदलू शकते आणि कोणत्याही जिल्ह्याचा दर्जा रद्दही करू शकते. मात्र, निर्माण झालेला महाकुंभमेळा जिल्हा तात्पुरता आहे. केवळ प्रयागराजच्या हद्दीत येणारे क्षेत्र जोडून ते तयार करण्यात आले आहे. यासाठी त्याच जिल्ह्याच्या डीएमकडून अधिसूचना जारी केली जाते.

प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभ 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. या महाकुंभात एकूण सहा शाही स्नान होणार आहे. या महाकुंभात देश-विदेशातील 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2024 12:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).