PM Modi in Lok Sabha: गेले पाच वर्षे 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'मध्ये गेली; पंतप्रधान मोदींनी केलं लोकसभेला संबोधित

गेली पाच वर्षे देशात सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाची होती. सुधारणा झाल्या, काम झाले आणि बदल घडताना आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहतो हे फार दुर्मिळ आहे. आज सतराव्या लोकसभेच्या माध्यमातून देश याचा अनुभव घेत आहे आणि मला विश्वास आहे की, सतराव्या लोकसभेला देश आवश्यक ते आशीर्वाद देत राहील, अंसही मोदी यावेळी म्हणाले.

PM Modi in Lok Sabha: गेले पाच वर्षे 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'मध्ये गेली; पंतप्रधान मोदींनी केलं लोकसभेला संबोधित
PM Modi (PC - X/ANI)

PM Modi in Lok Sabha: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Parliament Budget Session) शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज लोकसभेला (Lok Sabha) संबोधित केलं. गेली पाच वर्षे देशात सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाची होती. सुधारणा झाल्या, काम झाले आणि बदल घडताना आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहतो हे फार दुर्मिळ आहे. आज सतराव्या लोकसभेच्या माध्यमातून देश याचा अनुभव घेत आहे आणि मला विश्वास आहे की, सतराव्या लोकसभेला देश आवश्यक ते आशीर्वाद देत राहील, अंसही मोदी यावेळी म्हणाले. तसेच पंतप्रधानांनी यावेळी लोकसभा सभापतींचे कौतुक केले. रागाचे आणि आरोपांचे क्षण होते, पण तुम्ही संयम आणि शहाणपणाने संपूर्ण परिस्थिती हाताळली आणि सभागृह चालवले. यासाठी मी तुमचाही ऋणी आहे. या पाच वर्षांत संपूर्ण मानवजातीला या शतकातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. कोण वाचेल, कोण टिकेल, कोणी कोणाला वाचवेल की नाही, अशी परिस्थिती होती. अशा स्थितीत सभागृहात येणेही जोखमीचे काम होते. पण, तुम्ही देशाचे काम थांबू दिले नाही. तुम्ही सभागृह अगदी कुशलतेने हाताळले आहे.

पहिल्या अधिवेशनात 30 विधेयके मंजूर -

तुमच्या पुढाकारामुळे आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे 17 व्या लोकसभेत 97% काम झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. सात सत्रांमध्ये 100 टक्क्यांहून अधिक उत्पादकता होती. या यशाबद्दल मी सर्व खासदारांचे आभार मानतो. पहिल्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात तीस विधेयके मंजूर झाली. हा एक विक्रम आहे, असंही यावेळी पंतप्रधानांनी नमूद केलं. (हेही वाचा - CAA ची अंमलबजावणी Lok Sabha Polls 2024 पूर्वी करणार - केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची मोठी घोषणा)

खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात -

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला आदरणीय खासदारांचे कृतज्ञता व्यक्त करायचे आहे की, त्या काळात देशाची परिस्थिती लक्षात घेऊन खासदार निधी सोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव आल्यावर सर्व खासदारांनी एकमताने तो मान्य केला. देशवासीयांना सकारात्मक संदेश देण्यासाठी आणि समाजाला विश्वास देण्यासाठी खासदारांनी आपल्या पगारात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. (CAA: भारतीय नागरिकत्व कसे मिळते? काय आहेत राज्यघटनेतील तरतुदी? वाचा सविस्तर .)

देशाला संसदेची नवी इमारत मिळाली -

संसदेची नवीन इमारत असावी यावर सर्वांनी चर्चा केली. पण तुमच्या नेतृत्वानेच हे काम पुढे नेले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आज देशाला संसदेची नवी इमारत मिळाली आहे. ही इमारत भारताच्या येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणाशी सदैव जोडून ठेवेल. देशाला पुढे नेण्याची प्रेरणाही यातून मिळेल, असा दावा यावेळी मोदींनी केला.

(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2024 06:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).