Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना मदत केल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

"युक्रेनच्या (Ukraine) सुमी ओब्लास्टमध्ये अडकलेल्या भारतीयांसह काही बांगलादेशी नागरिकांची सुटका आणि मदत केल्याबद्दल मी तुमचे आणि तुमच्या सरकारचे मनापासून आभार व्यक्त करत आहे.

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना मदत केल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार
Bangladesh PM Sheikh Hasina (Photo Credit -PTI)

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hashina) यांनी मंगळवारी बांगलादेशी नागरिकांना (Bangladesh) बाहेर काढण्यात मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भारत सरकारचे (Indian Govt) आभार मानले. पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात हसीना शेख यांनी लिहिले, "युक्रेनच्या (Ukraine) सुमी ओब्लास्टमध्ये अडकलेल्या भारतीयांसह काही बांगलादेशी नागरिकांची सुटका आणि मदत केल्याबद्दल मी तुमचे आणि तुमच्या सरकारचे मनापासून आभार व्यक्त करत आहे. या संदर्भात तुमचे सरकार जे मनापासून सहकार्य करत आहे, ते आमच्या दोन्ही देशांनी गेल्या अनेक वर्षांपासून लाभलेल्या अनोख्या आणि चांगल्या संबंधांचा पुरावा आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी बांगलादेशला दिलेल्या भेटीचेही त्यांनी स्मरण केले. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत आमचे द्विपक्षीय संबंध सर्व स्तरांवर अर्थपूर्ण सहभागातून अधिक दृढ झाले आहेत.” त्यांनी होळीच्या शुभेच्छाही दिल्या आणि दोन्ही देश एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हे ही वाचा: Sonia Gandhi यांनी UP, Goa, Manipur, Uttarakhand, Punjab PCC Presidents चे मागितले राजीनामे)

'दोन्ही देश नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील'

"मला खात्री आहे की बांगलादेश आणि भारत हे दोन्ही देश नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या सामूहिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करतील," हसिना शेख पुढे म्हणतात, मी तुम्हाला खूप चांगले आरोग्य आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा देते.”

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी यापूर्वी 9 मार्च रोजी ऑपरेशन गंगा अंतर्गत बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढल्याबद्दल त्यांच्या भारतीय समकक्षांचे आभार मानले होते. युक्रेनच्या शेजारील देशांतून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 20,000 हून अधिक भारतीय आणि इतर नागरिकांना विशेष विमानांद्वारे भारतात परत आणण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2022 09:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).