Vijay Diwas 2020: अमित शाह, राहुल गांधी यांच्यासह मान्यवरांकडून 50व्या विजय दिवस निमित्त जवानांच्या शौर्याला सलाम करत खास शुभेच्छा!
यंदा या भारत-पाकिस्तानच्या 71 सालच्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान 'Swarnim Vijay Mashaal'प्रज्वलित करणार आहेत.
पाकिस्तानवर भारतीय लष्करी सेनेच्या ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणजे 16 डिसेंबर 1971. 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारत- पाकिस्तान युद्धामध्ये मोठा विजय मिळवत पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन तुकडे करत पूर्व पाकिस्तान हा देश बांग्लादेश म्हणून अस्तित्त्वात आला. आजच्याच दिवशी बांग्लादेश मध्ये बिजॉय दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. दरम्यान या युद्धामध्ये भारतीय जवानांनी दाखवलेलं शौर्य, अदम्य विश्वास आणि आपल्या प्राणांची आहुती देणार्या वीर जवानांना आजच्या दिवशी नमन केलं जातं. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, आमदार रोहित पवार, अमित देशमुख यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी, समान्य जनतेने भारतीय जवानांना सलाम केला आहे. ट्वीटर वर त्या निमित्ताने खास शुभेच्छापत्र शेअर करण्यात आली आहेत. Vijay Diwas 2020 Wishes: 1971 'विजय दिवसा'निमित्त Wallpapers, WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून Quotes शेअर करून करा जवानांना नमन.
अमित शाह
1971 में आज ही के दिन भारतीय सेना ने अपने अदम्य साहस और पराक्रम से मानवीय स्वतंत्रता के सार्वभौमिक मूल्यों की रक्षा करते हुए विश्व मानचित्र पर एक ऐतिहासिक बदलाव किया।
इतिहास में स्वर्ण अक्षरों से अंकित यह शौर्यगाथा हर भारतीय को गौरवान्वित करती रहेगी।
विजय दिवस की शुभकामनाएं। pic.twitter.com/8mMdDn4Nse
— Amit Shah (@AmitShah) December 16, 2020
राजनाथ सिंह
आज विजय दिवस के अवसर मैं भारतीय सेना के शौर्य एवं पराक्रम की परम्परा को नमन करता हूँ। मैं स्मरण करता हूँ उन जाँबाज़ सैनिकों की बहादुरी को जिन्होंने १९७१ के युद्ध में एक नई शौर्यगाथा लिखी। उनका त्याग और बलिदान सभी भारतीयों के लिए प्रेरणा का स्रोत है। यह देश उन्हें हमेशा याद रखेगा।
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 16, 2020
रोहित पवार
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांग्लादेशची निर्मिती केली तो आजचा दिवस. आजच्या या 'विजय दिना'निमित्त या युद्धात वीरमरण आलेल्या सर्व जवानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! pic.twitter.com/LTGFzlugDH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 16, 2020
अमित देशमुख
आजच्या दिनी १९७१ ला भारतीय सैन्याने श्रेष्ठत्व सिद्ध करून पाकिस्तानी सैन्यास आत्मसमर्पण करण्यास भाग पाडल्याने हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा #विजय_दिवस मानला जातो. ५० व्या विजय दिवसाच्या शुभेच्छा. या युद्धातील सर्व विरपुत्रांना श्रद्धांजली.#VijayDiwas pic.twitter.com/3zqJfKAupx
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) December 16, 2020
राहुल गांधी
सन् ‘71 में भारत की पाकिस्तान पर ऐतिहासिक जीत के उत्सव पर देशवासियों को शुभकामनाएँ और सेना के शौर्य को नमन।
ये उस समय की बात है जब भारत के पड़ोसी देश भारत के प्रधानमंत्री का लोहा मानते थे और हमारे देश की सीमा का उल्लंघन करने से डरते थे!#VijayDiwas
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 16, 2020
3 डिसेंबर 1971 दिवशी भारत सरकारने पाकिस्तान विरूद्ध युद्ध छेडले होते. त्यानंतर पाकिस्तान चे लष्कर जनरल अयुब खाब यांच्या अत्याचारातून पूर्व पाकिस्तानच्या लोकांची मुक्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पाकिस्तान विरूद्ध सुमारे 13 दिवस युद्ध सुरू होते. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सेना कोणत्याही अटी शर्ती शिवाय आत्मसमर्पणासाठी पुढे आली आणि हे युद्ध संपलं.
यंदा या भारत-पाकिस्तानच्या 71 सालच्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान 'Swarnim Vijay Mashaal'प्रज्वलित करणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2020 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

