Coronavirus Lock Down: लॉक डाऊन लक्षात घेता सरकारने तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे - रामदास आठवले
लॉक डाऊनमुळे (Lock Down) सर्व गोर गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे. किंवा अगदीच सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.
लॉक डाऊनमुळे (Lock Down) सर्व गोर गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे. किंवा अगदीच सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील अर्धी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनी ने माफ करावे तसेच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही विजमिटर कापू नये अशी सूचना आठवले यांनी वीज कंपनी संस्थांना केली आहे. रामदास आठवले यांनी हात जोडून केली देशवासीयांना 'ही' विनंती; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विट केली नवी कविता (Watch Video)
प्राप्त माहितीनुसार, मुंबई उपनगर मध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीतर्फे 18 टक्के वीजबिल माफ करण्यात आले आहे, मात्र यात आणखीन कपात करता येईल का हे तपासण्याची विनंती आपण त्यांना केली आहे, असे आठवले यांनी माध्यमांना सांगितले तर मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिकेने स्थायी समिती मध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा अशीही विनंती वजा सूचना आठवले यांनी केली आहे. ( हेही वाचा, Coronavirus च्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना पाठवणार सरासरी बिल; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा )
रामदास आठवले ट्विट
पुढील 4 महिने कोणाचेही लाईट मीटर कापू नये; वीज कंपन्यांनी 3 महिन्यांचे लाईट बिल 50 टक्के माफ करावे. त्यासाठी राज्य शासनाने निर्णय घ्यावा. मनपा स्थायी समितीने ठराव संमत करावा.मुख्यमंत्री@CMOMaharashtra यांनी याबाबत निर्णय घ्यावा. pic.twitter.com/8IuRBYKK3W
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 4, 2020
दरम्यान, वीजबिल माफ करण्यासोबत कोरोनाची चाचणी मोफत किंवा अल्प दरात करण्यात यावी अशीही मागणी आठवले यांनी केली आहे. सध्या कोरोना चाचणी साठी 5 हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. मात्र साहजिकच हे दर गरिबांना परवडणारे नाहीत त्यामुळे ही चाचणी मोफत किंवा रु.500 इतक्या अल्पदरात केली जावी, असे आठवले यांनी म्हंटले आहे, आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत असेही आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी मदत करीत आहेत त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2020 05:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

