वंदे भारत मिशनच्या 3 ऱ्या टप्प्या अंतर्गत एअर इंडियाने यूएसए आणि यूकेसह विविध देशांमध्ये सुमारे 300 विमानांसाठी बुकिंग सुरू केली.

हरियाणामध्ये आज 316 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

मुंबईत आज 1150 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

दिल्लीत आज 1330 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26334 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत दिल्लीत 708 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

गुजरात मधील पोरबंदर येथील भारतीय नौदलातील 16 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

गोव्यात दुसऱ्या ठिकाणाहून येणाऱ्यांची 100 टक्के चाचणी करण्यात येत असून जवळजवळ 130 कोरोनाचे रुग्ण राज्यात असल्याची प्रमोद सावंत यांनी माहिती दिली आहे.

गुजरात येथे गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 510 रुग्ण आढळून आले असून 35 जणांचा बळी गेला आहे.

पश्चिम बंगाल येथे आज कोरोनाचे नवे 427 रुग्ण आढळून आल्याने आकडा 7303 वर पोहचला आहे.

छत्तीसगढ येथे आज कोरोनाचे नवे 90 रुग्ण आढळून आल्याने आकडा 863 वर पोहचला आहे.

मणिपूर येथे आणखी 8 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 132 वर पोहचला आहे.

Load More

निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarga Cyclone) रायगड जिल्ह्यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. चक्रीवादळामुळे अनेकांची घरे कोलमडून गेली तर अनेकांचे संसार उघडल्यावर पडले. आज पावसाचा जोर कमी झाल्यामुळे येथील परिसराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार आहेत. आज सकाळी 11.30 मिनिटांनी गोल्डन गेट ने रो-रो बोटीतून मांडला जेटीकडे प्रस्थान करतील. अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. तसेच येथील नुकसानग्रस्त नागरिकांसी देखील बातचीत करतील.

निसर्ग चक्रीवादळाचा धोका जरी शमला असला तरीही कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट महाराष्ट्रावर अजूनही घोंगावत आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाग्रस्तांची संख्या 77,793 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 2710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर भारतात 2,16,919 एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. देशात आतापर्यंत 6075 कोरोना रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.