नवी दिल्लीतील तळीरामांना उद्यापासून दारू खरेदीवर अतिरिक्त 70% कर मोजावा लागणार असून दिल्ली सरकारने ही स्पेशल कोरोना फी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्लीतील तळीरामांना उद्यापासून दारू खरेदीवर अतिरिक्त 70% कर मोजावा लागणार असून दिल्ली सरकारने ही स्पेशल कोरोना फी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्लीतील तळीरामांना उद्यापासून दारू खरेदीवर अतिरिक्त 70% कर मोजावा लागणार असून दिल्ली सरकारने ही स्पेशल कोरोना फी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 771 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले रुग्णांची एकूण संख्या 14,541 वर पोहोचली आहे. यातील 35 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 583 वर पोहोचला आहे अशी आरोग्य विभागाने दिली आहे.
35 deaths and 771 new #COVID19 positive cases recorded in Maharashtra today, taking the total number of cases in the state to 14541. Death toll due to Coronavirus stands at 583 in the state: Maharashtra Health Department— ANI (@ANI) May 4, 2020
नवी दिल्लीत आज 349 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 4898 वर पोहोचली आहे. मात्र गेल्या 24 तासांत एकही रुग्ण दगावले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
349 new #COVID19 positive cases reported in Delhi today, taking the total number of cases to 4898; no deaths due to Coronavirus recorded in the state in the last 24 hours: State Health Department pic.twitter.com/WrxD7ignyc— ANI (@ANI) May 4, 2020
प्रसिद्ध कलाकार रणजित दहिया यांनी वांद्रे येथील आपल्या घराच्या भिंतीवर अभिनेता इनफान यांचे छायाचित्र रेखाटले आहे. तसेच इरफान खान हा माझ्या आवडत्या कलाकरांपैकी एक होता, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. एएनआयचे ट्वीट-
Maharashtra: Artist Ranjit Dahiya paints a mural of actor Irrfan Khan, who recently passed away, on the wall of a house in Bandra,Mumbai.He says, "Khan was one of my favorite actors so I decided to pay him tribute by painting his mural. I've been working on it since last 3 days". pic.twitter.com/UGcWeEzM9V— ANI (@ANI) May 4, 2020
राजस्थान मध्ये 175 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3061 वर पोहोचली आहे. तसेच 6 नव्या रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 77 इतका झाला आहे.
6 deaths and 175 new #Coronavirus positive cases reported in Rajasthan taking the total number of cases in the state to 3061; 77 deaths recorded in the state so far: Sate Health Department pic.twitter.com/KmpjMz3Qcd— ANI (@ANI) May 4, 2020
कोरोनाच्या संकटामुळे राज्यभरातल्या रखडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
करोनाच्या संकटामुळे राज्यभरातल्या रखडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (ता. 4) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली pic.twitter.com/VQVmhJw9bx— AIR News Pune (@airnews_pune) May 4, 2020
मुंबईमध्ये आज 510 नव्या कोरोना रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 18 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 9123 वर पोहोचली आहे.
510 new COVID19 positive cases, 18 deaths recorded in Mumbai today, taking the total number of positive cases to 9123, death toll 361: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/tOK1jYWhpA— ANI (@ANI) May 4, 2020
कर्नाटकामध्ये दारूची दुकाने उघडल्यानंतर पहिल्याचं दिवशी 45 कोटी रुपयांची दारू विक्री करण्यात आली आहे. कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
Liquor sales of Rs 45 crores recorded on the first day of opening of liquor shops: Karnataka Excise Department#COVID19Lockdown— ANI (@ANI) May 4, 2020
देशभरासह महाराष्ट्रावर कोरोना व्हायरसचे महासंकट ओढावले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतर लॉकडाउनचा निर्णय राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती पाहून जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. राज्यातील मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आता केंद्र सरकारने विविध राज्यात अडकलेले कामगार, विद्यार्थी आणि भाविकांना आपल्या घरी जाता यावे यासाठी स्पेशल ट्रेन आणि बसची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
परराज्यातील मजूर आणि कामगार हे लॉकडाउनमुळे अडकले होते. परंतु आता त्यांनाआपल्या घरी जाता येत आहे. त्यामुळे मजूर आणि कामगारांची परिस्थिती पाहता त्यांच्याकडून रेल्वे तिकिटांचे शुल्क आकारु नयेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. तसेच या सर्वांची वैद्यकिय चाचणी आणि रजिस्ट्रेशन करुन आपापल्या राज्यात पाठवले जात आहेत. दुसरीकडे पंजाब येथे कोरोनाबाधितांचा आकडा अचानक 300 वरुन 1 हजारांच्या पार गेल्याने सध्या राजकरण तापले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर नागपूरात लॉकडाउन येत्या 17 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. त्याचसोबत कंन्टेंटमेंट झोनव्यतिरिक्त 33 टक्के ऑफिसेस बंद राहणार आहेत. मात्र अत्यावश्यक सेवासुविधा नागपूरात सुरु राहतील असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.