असाममध्ये आज 380 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 6 हजार 15 वर पोहचली आहे. ट्विट- 

 

KXIP vs RR, IPL 2020: राजस्थान रॉयल्स संघाचा किंग्ज इलेव्हन पंजाब वर 7 गडी राखून विजय मिळवला आहे.

Jammu and Kashmir: हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. अवंतीपोरा पोलिसांनी सुरक्षा दलांसमवेत केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरु आहे अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

कांदा व्यापाऱ्यांसाठी साठा मर्यादा 1500 MT पर्यंत वाढवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पियुष गोयल यांना विनंती केली आहे.

झारखंडे येथे आज 323 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 421 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची आकडा 1 लाख 1 हजार 287 वर पोहचला आहे. ट्विट-

 

दिल्ली येथे आज 5 हजार 891 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 81 हजार 644 वर पोहचली आहे. ट्वीट-

 

महाराष्ट्रात आज 6 हजार 190  रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची सख्या 16 लाख 72 हजार 858 वर पोहचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 25 हजार 418 रुग्णावर उपचार सुरु आहेत. ट्विट-

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सरदार सरोवर धरणात डायनॅमिक धरणाच्या प्रकाशयोजनाचे उद्घाटन केले आहे. ट्विट-

  

राजस्थान येथे आज आणखी 1 हजार 794 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 95 हजार 213 वर पोहचली आहे. ट्विट- 

 

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्व स्टेज कॅरिज, मिनी आणि स्कूल बससाठी 31 डिसेंबरपर्यंत मोटार वाहन कर माफ करण्याचे आदेश दिले आहेत. ट्वीट-

 

Load More

भारतामध्ये आज शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा यांच्यासोबतच ईद-ए-मिलाद उन नबी चा सण देखील साजरा केला जात आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचं वातावरण आहे. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या आहेत. ईदचा सण समाजात एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करायला मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शरद पौर्णिमेच्या निमित्ताने आज भारतामध्ये वाराणसी मध्ये भाविकांनी गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. गंगा घाट वर पुजा करण्यासाठीदेखील भाविक मंडळी जमली आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान भारतामध्ये कोरोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. मात्र नव्या रूग्णांचं निदान होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. देशामध्ये आता कोविड 19 टेस्टिंग लॅब आणि क्षमता वाढवल्या आहेत. दरम्यान आता 10.65 कोटी टेस्टिंग झाल्या आहे. दिलासादायक बाब म्हणजे टेस्टिंग वाढवलं तरीही नवे रूग्ण वाढीचा दर कमी आहे. भारताचा टेस्ट पॉझिटीव्हीचं प्रमाण आता 7.54% आहे.