शनिवार, ऑगस्ट 29, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
लाडकी बहीण योजनेसाठी महा आयडी कार्डद्वारे e-KYC अनिवार्य? राज्य सरकारकडून दावा फेटाळला | Chinchpokli Cha Chintamani 2026 First Look Revealed: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लूक पहा; बालाजी रूपातील सजावटीची भाविकांना प्रतीक्षा | Chinchpokli Cha Chintamani 2026 Live streaming: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा; इथे पहा थेट प्रक्षेपण |
Live

दिल्ली-लखनऊ आणि मुंबई-अहमदाबाद या तेजस एक्स्प्रेस गाड्या 14 फेब्रुवारीपासून पुन्हा धावतील; 29 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या टीम लेटेस्टली | Jan 29, 2021 11:18 PM IST
A+
A-
29 Jan, 23:18 (IST)

IRCTC संचालित नवी दिल्ली-लखनऊ आणि मुंबई-अहमदाबाद या तेजस एक्स्प्रेस गाड्या 14 फेब्रुवारीपासून पुन्हा धावतील. कोरोनामुळे गेल्या 10 महिन्यांपासून या गाड्या बंद होत्या.

29 Jan, 22:11 (IST)

आज सिंघू सीमेवरील हिंसाचाराच्या संदर्भात SHO Alipur वर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीसह 44 जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली.

29 Jan, 21:45 (IST)

राज्यात 539 केंद्रांच्या माध्यमातून 40, 732 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण झाले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक (131 टक्के), तर सातारा, धुळे, वर्धा, पालघर या जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 61 हजार 319 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे.

29 Jan, 21:19 (IST)

महाराष्ट्र राज्यात आज 2771 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2613 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1925800 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 43147  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.28% झाले आहे.

29 Jan, 20:55 (IST)

30 जानेवारी हा सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जाईल. आमचे सर्व नेते सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उपोषण करतील, असं किसान मोर्चाच्या नेत्यांनी सांगितलं आहे. 

किसान मोर्चाचे नेते

 

29 Jan, 20:43 (IST)

दिल्लीमध्ये आज 249 नवे कोरोना रुग्ण, तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

29 Jan, 20:26 (IST)

भ्रष्टाचार, अकार्यक्षमतेच्या आरोपाखाली ओडिशा सरकारतर्फे आणखी 9 अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आहे.

 

29 Jan, 20:15 (IST)

राकेश टिकैट आणि शेतकरी खरे देशभक्त आहेत. ते नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताबद्दल बोलत असतात, असं जेजेपी नेते दिग्विजय चौटाला यांनी म्हटलं आहे.

 

29 Jan, 19:54 (IST)

राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

29 Jan, 19:47 (IST)

आज दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलिस हाय अलर्टवर आहेत. त्यामुळे सुरक्षा कडक करण्यात आली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

Load More

केंद्र सरकारचं अर्थसंकल्प अधिवेशनाला आजपासून दिल्लीमध्ये सुरूवात होत आहे. दरम्यान आज आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल 2020 सादर केला जाणार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला यंदाचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. विरोधकांनी मात्र आज बजेट पूर्वीच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी कायदे चर्चेविना परित केल्याने आणि शेतकर्‍यांना अपेक्षित चर्चा होत नसल्याने आता विरोधकांनी शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवत अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे.

अधिवेशन सुरू असताना आता किसान आंदोलनामुळे सुरक्षा व्यवस्था सीमाभागात चोख करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी शेतकऱ्यांना हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काल गाझीपूर सीमेवर तणाव निर्माण झाला. मात्र, कोणत्याही स्थितीत शेतकरी गाझीपूर सीमेवरून मागे हटणार नाहीत, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. ते मीडीयाशी बोलताना काही काळ भावूक देखील झाले होते.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

गाझीपूर बॉर्डरवर मात्र पोलिसांचा फौजफाटा असला तरीही जागा रिकामी करणार नाही असं ठणकावून सांगत अनेकांनी 'जय जवान जय किसान' अशा घोषणा दिल्या आहेत. काही शेतकरी संघटनांनी लाल किल्ला हिंसाचार प्रकरणानंतर या आंदोलनातून माघार घेतली आहे.

SocialLY


Show Full Article Share Now
Close
Latestly whatsapp channel