जम्मू-काश्मीरमध्ये 31 मार्च संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार असल्याचे जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कन्सल यांनी सांगितले आहे. तसेच 3 पेक्षा अधिक माणसांचा घोळका दिसल्यास त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

भारतात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून हा आकडा आता 396 वर जाऊन पोहोचला आहे. ही माहिती भारतीय कौन्सिल वैद्यकीय संशोधन केंद्राने दिली आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता नाशिकमधील नोटा छपाई कारखाना 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. नोटा छपाई कारखाना संघटनेचे प्रमुख जगदीश गोडसे यांनी ही माहिती दिली आहे.

केरळमध्ये आणखी 15 कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आढळल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 5 एप्रिलला होणारी ही पूर्व परीक्षा आता 26 एप्रिलला होणार आहे.

भारतात आरोग्य मंत्रालयाकडे आलेल्या रिपोर्टनुसार आतापर्यंत देशात 360 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात 41 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. येथे पाहा संपूर्ण यादी

पुणे पाठोपाठ नाशिक शहरातही आज रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले आहे, असे समजत आहे.

राज्याचे अल्पसंख्या मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहनाच्या पुढील चाक फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच मुंबईहून परभणीला आढावा बैठकीसाठी सरकारी वाहनातून जात असताना नगरमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास केडगाव चौकात बायपासवर त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

सध्या भारतावर कोरोना व्हायरसचे संकट वावरत असताना आपल्या देशातील लोकांच्या सुरक्षितेसाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहेत. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कुटुंबाच्या समवेत टाळी वाजवून डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.ट्वीट-

 

करोना व्हायरच्या विरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी मार्च रोजी जनतेला टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन केले होते. या आवाहनला जनतेनेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.. रविवारी संध्याकाळी बरोबर 5 वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या आहेत.दरम्यान बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांच्यासह अनिक कुमार आणि अक्षय कुमारनेही ट्वीटरच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे कौतूक करत त्यांचे आभारही मानले आहेत. 

Load More

कोरोना व्हायरस विरूद्ध सुरू झालेल्या युद्धामध्ये आज (22 मार्च) चा दिवस भारतीयांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार देशभर कडकडीत बंद अर्थात 'जनता कर्फ्यु' ला सुरूवात झाली आहे. मुंबई, पुणे सह देशभरात अनेक राज्यातील शहरांमध्ये लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्येही नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यानुसार आता 31 मार्च पर्यंत सामान्यांना अतिमहत्त्वाचे काम न नसल्यास बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई लोकलमध्ये आता केवळ अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी काम करताना दिसतील. तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील 29 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. Coronavirus च्या भीतीने घरी परतणाऱ्या लोकांना पीएम नरेंद्र मोदी यांचा प्रवास न करण्याचा सल्ला; ‘शहरे सोडू नका, आहे तिथेच रहा’

जगभरात वाढत असलेला कोरोनाचा विळखा तोडण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हा एक महत्त्वाचा खबरदारीचा पर्याय आहे. त्यानुसार आता नागरिक स्वतःहून घरी बसण्याचा निर्णय घेत आहे. मात्र या काळात हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्स, दूध, अन्नधान्य आणि बॅंक सुरू राहणार आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

सध्या देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 317 वर पोहचला असून पुढील दोन आठवडे भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपण संयम आणि संकल्प ठेवून वागल्यास भारताचा कोरोना व्हायरसविरूद्धचा लढा यशस्वी ठरू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत नागरिकांना या 'वॉर व्हर्सेस व्हायरस' मध्ये एकजुटीने उभं राहण्याचं कळकळीचं आवाहन केले आहे.