इटलीत कोरोना व्हायरसमुळे 627 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला असून इटलीतील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा आकडा 4000 च्या वर गेल्याचे वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिला आहे.

भारतात कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून हा आकडा 236 वर येऊन पोहोचला आहे. भारतीय वैद्यकिय संशोधनात ही बाब उघड झाली आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर 22 मार्च रोजी ठेवण्यात आलेल्या 'जनता कर्फ्यू' मध्ये रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. 21 मार्च मध्यरात्रीपासून ते 22 मध्यरात्रीपर्यंत ही रेल्वे सेवा बंद राहणार आहे. तसेच या काळात एकही एक्सप्रेस मुंबईहून सुटणार नाही असेही सांगण्यात येत आहे.  

जबलपूरमध्ये 4 कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यातील 3 जण हे एकाच कुटूंबातील आहेत. हे तिघे दुबईवरुन आले असल्याचे सांगण्यात येत आहेत. तर चौथा रुग्ण हा जर्मनीवरुन आलेला सांगण्यात येत आहे.

कोरोना व्हायरस ची सद्य स्थिती लक्षात घेता Air India च्या कर्मचा-यांच्या पगारातील भत्त्यात 10% ची कपात करण्यात आली आहे. कॅबिन क्रू वगळता अन्य सर्व कर्मचा-यांच्या पगारात ही कपात करण्यात आली आहे. मार्च 2020 च्या पगारापासून हे लागू करण्यात येईल.

भूषण धर्माधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी धर्माधिकारी यांना न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर प्रयत्न होत आहेत आपणही जिल्हा व ग्रामीण पातळीपर्यंत असे प्रयत्न करत आहोत नागरिकांनीही स्वयंशिस्त बाळगावी आणि घराबाहेर पडणे टाळावे- महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांचे आवाहन.

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रशासनाकडून सार्वजनिक मालमत्तेचं निर्जंतुकीकरण सुरु आहे.  परंतु परिस्थितीचं गांभीर्य आणि प्रशासनावरचा कार्यभार पाहता रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक स्वतःच पुढाकार घेत बस थांबे स्वच्छ करत आहेत, असे ट्विट मनसेने केले आहे.

केरळ राज्यातील कासारगोडम आणि पलक्कड येथील एकूण 12 जणांची COVID-19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 40 इतकी झाली आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.एएनआय ट्विट

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्यात आल्याने तसेच, जमावबंदी आदी कारणांमुळे राज्यभरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. राज्यभरातील एकूण कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल बंद झाली आहे.

Load More

2012 साली घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश यांना आज सकाळी 5:30 वाजता फाशी देण्यात आली. यापूर्वी अनेक कारणांमुळे या चौघांच्या फाशीच्या शिक्षेला दिरंगाई होत होती. मात्र आज अखेर त्यांना फासावर लटकवण्यात आले आणि निर्भयासह तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. यानंतर सर्वच स्तरातून विजयोत्सव साजरा केला जात आहे. (निर्भयाला न्याय मिळाला! दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार ही दोषींना तिहार जेल मध्ये फाशी)

कोरोना व्हायरसने भारत देशात शिरकाव केला असून 169 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. मात्र कोरोना व्हायरसने भीषण रुप धारण करु नये म्हणून सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार, 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू असणार असल्याचे काल (19 मार्च) जनतेला संबोधित करताना सांगितले. जनात कर्फ्यू मध्ये सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे मोदींनी देशवासियांना आवाहन केले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्र राज्यातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित 48 रुग्ण असून नागरिकांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. तसंच हा महाराष्ट्र शिवरायांचा असून लढवय्या आहे असे म्हणत त्यांनी देशभरातील गंभीर स्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या जनतेचे मनोबल वाढवले.