महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 193 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट-
193 positive cases and 10 deaths reported in last 24 hours in Pune district. Death toll is at 221 while total positive cases are 4370: Health Department, Pune #Maharashtra— ANI (@ANI) May 19, 2020
1 जून पासून दररोज 200 नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार आहेत, असं रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं आहे.
Indian Railways to run 200 non-AC trains from 1st June everyday as per the time table; online booking for these to begin soon: Railways Minister Piyush Goyal pic.twitter.com/FyuDQYCfq8— ANI (@ANI) May 19, 2020
लॉकडाउनच्या काळात अवैध मद्य विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी 5797 गुन्हे दाखल; आतापर्यंत 2601आरोपींना अटक तर, 15 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. एएनआयचे ट्वीट-
राज्यात ५५६९ मद्यविक्री दुकाने सुरू. दिवसभरात ३२ हजार ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा. अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत ५७९७ गुन्ह्यांची नोंद, २६०१ आरोपींना अटक तर १५ कोटी ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त- उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप pic.twitter.com/JVabhAEIB3— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 19, 2020
महाराष्ट्रात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण मुंबई शहरात आढळून आले आहेत. मुंबईत आज 1 हजार 411 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 43 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्विट-
1411 new #COVID19 positive cases and 43 deaths have been reported in Mumbai today. Total positive cases stand at 22,563 and death toll stands at 800: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra— ANI (@ANI) May 19, 2020
सुरुवातीला कोविड 19 रूग्णांना ठेवण्यासाठी पलंगाची काही कमतरता जाणवली परंतु आता आम्ही तयार आहोत असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. एनएससीआय डोम, एमएमआरडीए मैदान आणि इतर ठिकाणी व्यवस्था केल्यावर आता कोविड रूग्णांसाठी 15000 बेड्स आणि आयसीयूसाठी 2000 बेड उपलब्ध आहेत असेही टोपे यांनी म्हंटले आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयातील 80% बेड सुद्धा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विचार आहे.
We are also planning to take control of 80% beds of all private hospitals in the state to treat #COVID19 patients on lesser expenses: Maharashtra Health Minister Rajesh Tope— ANI (@ANI) May 19, 2020
घाटकोपर येथील पंत नगर भागातील एका गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर 'समोसा पार्टी' आयोजित करून लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि पक्षाचे संयोजक यांना अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले. पुढील चौकशी सुरू आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Members of a housing society in Pant Nagar Area of Ghatkopar were booked for violating lockdown norms by organising a 'samosa party'. Chairman of the housing society & organiser of the party were arrested & released on bail. Further probe is underway: Mumbai Police pic.twitter.com/vqhceKL0Ws— ANI (@ANI) May 19, 2020
महाराष्ट्रात आज कोरोनाचे 2100 नवे रुग्ण आढळले आहेत, यानुसार राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या 37,158 वर पोहचली आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
Maharashtra reports 2,100 new COVID-19 cases, taking tally to 37,158: Health Minister Rajesh Tope— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2020
मुंबईतील धारावीत आज 26 नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. यानुसार आजवर कोरोनाचे एकूण 1,353 धारावी मध्ये आढळले आहेत. याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून माहिती देण्यात आली आहे.
देशात एका दिवसात 1,08,233 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 24,25,742 नमुन्यांची चाचणी घेण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 11 हजार 39 चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
A record number of 1,08,233 samples were tested yesterday in the country. So far a total of 24,25,742 samples have been tested: Ministry of Health and Family Welfare #COVID19— ANI (@ANI) May 19, 2020
पश्चिम बंगाल मध्ये अम्फान चक्रीवादळाची चाहूल लागली असून आज संकध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दिघा या भागात हा जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार उद्या अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगाल मध्ये धडकण्याची शक्यता आहे.
#WATCH: Rainfall and strong winds hit Digha in West Bengal. #CycloneAmphan is expected to make landfall tomorrow. pic.twitter.com/sglWtx4MbJ— ANI (@ANI) May 19, 2020
महाराष्ट्रामध्ये आज सकाळी एका अपघातामध्ये 4 स्थलांतरित मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान सोलापूर कडून झारखंडच्या दिशेने प्रवास करणार्या ट्रकचा यवतमाळ नजिक अपघात झाला. ट्रक आणि बसच्या धडकेमध्ये बसमधील 15 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मजुरांना सबुरी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. स्थलांतरित मजुरांची त्यांच्या मूळ गावी नेण्याची योग्य व्यवस्था केली जाईल असा विश्वास त्यांनी सरकारच्या वतीने दिला आहे. न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड आणि एम आर शाह यांनी 11 मे दिवशी अर्णब यांच्या विरोधातील निकाल राखीव ठेवला होता. यामध्ये पालघर मॉब लिंचिंग सोबतच वांद्रे स्थानकाबाहेरील मजुरांच्या गर्दी प्रकरणाचा समावेश होता.
दरम्यान मुंबईकरांना देखील आता पोलिसांनी सज्जड दम दिला आहे. 18 मे पासून लॉकडाऊन 4 सुरू झालं आहे. अद्याप राज्यात रेड झोनला सवलती देण्यात आलेल्या नाही त्यामुळे विनाकारक गाड्या घेऊन रस्त्यावर फिरणं टाळा. अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असे सांगण्यात आलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
सध्या राज्यांराज्यामध्ये वाहतूकीला परवानगी आहे. स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहे. देशभरात कोरोना बाधितांचा सध्या एक लाखाच्या जवळ पोहचला आहे. महाराष्ट्रातही काल सलग दुसर्या दिवशी 24 तासामध्ये 2 हजारापैक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.