Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार, पोलीस पथकाची अद्याप शोधमोहीम सुरू

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) चकमकी होण्याचे सत्र सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून या चकमकी होण्याचेे प्रमाण वाढले आहे. दरम्यान नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये एक दहशतवादी (Terrorist) ठार झाला आहे. कुलगाम (Kulgam) जिल्ह्यातील मुनंद भागात रविवारी  सुरक्षा दलांशी (Security force) झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला आहे. अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडून (Jammu and Kashmir Police) देण्यात आली आहे. कुलगाम चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार (Terrorists killed) झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. अशी माहिती एका पोलिस अधिकऱ्यांने दिली दिली आहे. कुलगाममध्ये रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या प्रकरणी अद्याप शोधमोहीम सुरू आहे. कुलगामच्या मुनंद भागात एन्काऊंटर सुरू झाले आहे. पोलिस आणि सुरक्षा दल तैनात आहेत. एका अज्ञात दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. शोध सुरू आहे. पुढील माहिती पुढे येईल, असे काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केले आहे.

पोलिस आणि सुरक्षा दलाने पोलीस संयुक्त संघ नंतर बाहेर सोडले. सैन्य क्षेत्रात बंद दहशतवादी उपस्थिती बद्दल विशिष्ट माहितीच्या आधारे शोध सुरू झाला. घटनास्थळी सैन्यांची शुन्यता वाढत असताना त्यांनी जोरदार येऊन चकमक सुरू केली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाने संशयित जागेला घेराव घातला असता लपून बसलेल्या दहशतवाद्याने शोध दलावर गोळीबार केला. बांदीपोराच्या वरच्या भागातील शोकबाबा जंगलात दुसरे ऑपरेशन चालू आहे. तेथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. आणखी एक दहशतवादी लपला असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्याचे सर्च ऑपरेशन चालू आहे.

सुरक्षा दलाच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात 10 चकमकी झाल्या आहेत. यात 21 दहशतवादी ठार झाले. यावर्षी सुरक्षा दलांचा दावा आहे की त्यांनी काश्मीरमधील वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांमध्ये आतापर्यंत 86 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटना वारंवार होत असतात. नुकतीच  एक शस्त्र साठा करुन ठेवल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार सीबीआय पथकाने या प्रकरणी कारवाई केली होती. पाकिस्तानातून अनेक दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. काही वेळा याची माहिती पोलिसांना मिळाली की त्यांना मारण्यात पोलिसांना यश येतं. मात्र यात भारतीय जवान देखील शहीद होतात.