IND vs SA 3rd ODI: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेत इतक्या वर्षांनंतर जिंकली मालिका

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 296 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 218 धावांवर ऑलआऊट झाला.

IND vs SA 3rd ODI: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेत इतक्या वर्षांनंतर जिंकली मालिका
Team India (Photo Credit - Twitter)

IND Beat SA: भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव (India Beat South Africa) केला. या सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने मालिकाही 2-1 अशी जिंकली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 296 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 218 धावांवर ऑलआऊट झाला. हा सामना जिंकून केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला आहे. (हे देखील वाचा: Ram Siya Ram Song Played In South Africa: केशव महाराज स्टेडियममध्ये येताच वाजले 'राम सिया राम' गाणं, व्हायरल झालेल्या व्हिडिओवर केएल राहुलने दिली अशी प्रतिक्रिया)

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताची अप्रतिम कामगिरी 

भारताने 2017-18 मध्ये 6 सामन्यांची एकदिवसीय मालिका 5-1 ने जिंकली होती. या मालिकेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी विराट कोहली सांभाळत होता. कोहलीनंतर आता केएल राहुलने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकणारा तो दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. टीम इंडियाने चार वर्षांनंतर आफ्रिकेच्या भूमीवर वनडे मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने 1992/93 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिली वनडे मालिका खेळली होती.

गोलंदाजांनी दाखवून दिली आपली ताकद 

दक्षिण आफ्रिकेसाठी एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. संघाकडून टोनी डी जॉर्जीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 81 धावांचे योगदान दिले. तर कर्णधार एडन मार्करामने 36 धावा केल्या. या दोन खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेचा अन्य कोणताही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. भारताकडून अर्शदीप सिंगने चार विकेट घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 2-2 विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी 1-1 विकेट घेतली.

संजू सॅमसनने झळकावले शतक 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. युवा सलामीवीर साई सुदर्शन अवघ्या 10 धावा करून बाद झाला. यानंतर रजत पाटीदारलाही 22 धावा करता आल्या. भारताने तीन गडी गमावून केवळ 101 धावा केल्या होत्या. कर्णधार केएल राहुललाही मोठी खेळी करता आली नाही आणि त्याला केवळ 21 धावा करता आल्या. मात्र यानंतर संजू सॅमसन आणि टिळक वर्मा यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. दोघांनीही परिस्थितीनुसार खेळ करत भारताला संकटातून बाहेर काढले. दोघांनीही जोखमीचे फटके न खेळता संयमी धावा केल्या. सामान्यत: मोठे शॉट्स खेळणाऱ्या सॅमसनने सुरुवातीलाच प्रचंड संयम दाखवला आणि वेग वाढवण्यासाठी एक आणि दोन धावा घेतल्या. क्रिझवर स्थिरावल्यानंतर तो टी-20 स्टाईलमध्ये खेळला. सॅमसनने 66 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला टिळक धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला, पण नंतर त्यांनी चांगली फलंदाजी केली.

दोघांनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी

संजू सॅमसनने 114 चेंडूत 108 धावा केल्या तर टिळक वर्माने 77 चेंडूत 52 धावा केल्या, जे त्याचे पहिले एकदिवसीय अर्धशतक आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. डेथ ओव्हर्समध्ये रिंकू सिंगने आपल्या लौकिकानुसार स्फोटक धावा केल्या आणि 27 चेंडूत 38 धावा जोडल्या. मात्र, दक्षिण आफ्रिकेने एकापाठोपाठ तीन विकेट घेत भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडू दिला नाही. या खेळाडूंमुळेच भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून वुरन हेंड्रिक्सने सर्वाधिक तीन बळी घेतले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2023 01:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).