IND vs AUS 3rd Test 2024: गाबाच्या मैदानावर आतापर्यंत 'हे' पाच भारतीय खेळाडू राहिले 'शतकवीर', जाणून घ्या कोणी झळकावले पहिले शतक
भारतीय संघाने पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. आता सर्वांचे लक्ष गब्बा कसोटी सामन्याकडे लागले आहे, जिथे टीम इंडियाने 2021 मध्ये कसोटी सामना जिंकून इतिहास रचला.
India Natioanl Cricket Team vs Australia Men's National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय संघाने पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. आता सर्वांचे लक्ष गब्बा कसोटी सामन्याकडे लागले आहे, जिथे टीम इंडियाने 2021 मध्ये कसोटी सामना जिंकून इतिहास रचला. आतापर्यंत केवळ एमएल जयसिम्हा, सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि मुरली विजय या चार भारतीय फलंदाजांना गाब्बाच्या मैदानावर कसोटी शतक झळकावता आले आहे.
एमएल जयसिम्हाने गाबामध्ये झळकावले पहिले शतक
गाबाच्या मैदानावर भारताचे पहिले कसोटी शतक 1968 साली झळकळे. तेव्हा एमएल जयसिम्हाने 101 धावांची खेळी केली होती. मात्र टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात अपयश आले. त्यानंतर 1977 मध्ये सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच मैदानावर 113 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारतीय संघाला हा सामना 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test 2024: तिसऱ्या कसोटीत भारताची सलामीची जोडी बदलणार? टीमसाठी घ्यावा लागणार मोठा निर्णय)
मुरली विजयने खेळली 144 धावांची खेळी
2003 मध्ये सौरव गांगुलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा येथे 144 धावांची इनिंग खेळली होती. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर 2014 साली मुरली विजयने याच मैदानावर 144 धावांची इनिंग खेळली होती. पण तरीही टीम इंडियाचा विजय झाला नव्हता. गाबा मैदानावर शतके झळकावणारे चारही भारतीय खेळाडू निवृत्त झाले आहेत. 2014 नंतर एकाही भारतीय फलंदाजाला गाब्बाच्या मैदानावर कसोटी शतक झळकावता आलेले नाही.
पंतने टीम इंडियाला मिळवून दिला होता विजय
भारतीय संघाने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाब्बा मैदानावर एकूण 7 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी केवळ एकच सामना जिंकू शकला आहे. टीम इंडियाला पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. 2021 मध्ये गाबा मैदानावर टीम इंडियाने जिंकलेला एक कसोटी सामना. त्यात ऋषभ पंतने 89 धावांची खेळी खेळून सर्वात मोठा हिरो असल्याचे सिद्ध केले आणि त्याच्यामुळेच टीम इंडिया सामना जिंकण्यात यशस्वी ठरली.
गाबा येथे सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज:
एमएल जयसिम्हा- 175 धावा
मुरली विजय-171 धावा
अजिंक्य रहाणे- 152 धावा
सौरव गांगुली- 144 धावा
चेतेश्वर पुजारा- 142 धावा
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2024 01:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

