Fastest Team 100 In Test Cricket: टीम इंडियाने रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास; बांगलादेशविरुद्ध सर्वात जलद 100 धावा केल्या

भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या.

Fastest Team 100 In Test Cricket: टीम इंडियाने रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास; बांगलादेशविरुद्ध सर्वात जलद 100 धावा केल्या
Rohit Sharma, Yashasvi Jaiswal (Photo: BCCI)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 2nd Test 2024 Day 4 Live Score Update: भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस सुरू आहे. कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर सामना सुरू आहे. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू झाला. बांगलादेशचा पहिला डाव 74.2 षटकात 233 धावांवर आटोपला. दरम्यान, टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वात जलद 100 धावा करत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करण्यासाठी टीम इंडियाला केवळ 61 चेंडूंचा सामना करावा लागला. (हेही वाचा: Virat Kohli New Record: विराट कोहली बनला सर्वात वेगवान 27,000 धावा करणारा फलंदाज, मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम)

टीम इंडियाने आपलाच रेकॉर्ड मोडला आहे. यापूर्वी भारताने पोर्ट ऑफ स्पेन येथे 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 12.2 षटकांत सर्वात जलद 100 धावा केल्या होत्या. आता भारताने हा विक्रम मागे टाकत नवा विक्रम केला आहे.

टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला, बांगलादेशविरुद्ध सर्वात जलद 100 धावा केल्या

कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद  शतक

10.1 षटके भारत विरुद्ध बांगलादेश कानपूर 2024

12.2 षटके भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पोर्ट ऑफ स्पेन 2023

13.1 षटके श्रीलंका विरुद्ध बांगलादेश कोलंबो SSC 2001

13.4 षटके बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज मिरपूर 2012

13.4 षटके इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कराची 2022

13.4 षटके इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान रावळपिंडी 2022

13.6 षटके ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पर्थ 2012

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने नाणेफेक जिंकण्यापूर्वी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 74.2 षटकांत 233 धावांवर आटोपला. तर टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा, आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि रवी अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).