India Beat West Indies: टीम इंडियाने रोवला विजयाचा झेंडा; वेस्ट इंडिजचा 'काम-तमाम' करत २-० ने मालिका जिंकली!

भारताने पाहुण्या संघाला फॉलो-ऑन दिल्यानंतरही वेस्टइंडिजने संघर्ष केला, परंतु अखेरीस भारतीय संघाने 121 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि मालिका 2-0 ने जिंकली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली कसोटी मालिका आपल्या नावावर केली.

India Beat West Indies: टीम इंडियाने रोवला विजयाचा झेंडा; वेस्ट इंडिजचा 'काम-तमाम' करत २-० ने मालिका जिंकली!

Team India Won Second Test: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा समारोप झाला असून, या सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत वेस्टइंडिजवर विजय मिळवला. भारताने पाहुण्या संघाला फॉलो-ऑन दिल्यानंतरही वेस्टइंडिजने संघर्ष केला, परंतु अखेरीस भारतीय संघाने 121 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि मालिका 2-0 ने जिंकली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली कसोटी मालिका आपल्या नावावर केली. IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये स्थान मिळणार का? संपूर्ण गणित समजून घ्या

भारताने वेस्टइंडिजवर दुसऱ्या कसोटीत मात केली

टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 5 गडी गमावून 518 धावा केल्या. यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत वेस्टइंडिजला 248 धावांवर रोखले. गिलने फॉलो-ऑन दिल्यानंतर वेस्टइंडिज पुन्हा फलंदाजीस उतरला. या वेळी जॉन कॅम्पबेल आणि शे होप यांनी शतके ठोकली, परंतु इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने संघ 390 धावांवर गारद झाला.

भारताने 121 धावांचे लक्ष्य गाठत मालिका जिंकली

भारतीय संघासमोर 121 धावांचे सोपे लक्ष्य होते. यशस्वी जयसवाल लवकर बाद झाला, परंतु के.एल. राहुल आणि साई सुदर्शन यांनी चांगली भागीदारी केली. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर शुभमन गिलने काही आकर्षक फटके खेळले. अखेर 36 व्या षटकात भारताने विजय मिळवत मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली. वेस्टइंडिजविरुद्ध कसोटीतील भारताचा विजयरथ असाच कायम राहिला.

के.एल. राहुलचे अर्धशतक

लक्ष्याचा पाठलाग करताना के.एल. राहुलने जबाबदारीची खेळी केली. यशस्वी जयसवाल आणि गिल आक्रमक खेळ करत बाद झाले, तर राहुलने शांतपणे धावा केल्या. त्याने 108 चेंडूत 58 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेवटचा विजयी फटका देखील राहुलनेच मारला आणि भारताला मालिका विजय मिळवून दिला.

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2025 11:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).