भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेच्या प्रस्तावासाठी शाहिद आफ्रिदीने शोएब अख्तरचे केले समर्थन, मोदी सरकारवर साधला निशाणा
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने यापूर्वी कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी भारत-पाकिस्तान वनडे मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मात्र अख्तरचे हा प्रस्ताव ठेवण्यासाठी कौतुक केले आणि सोबतच नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.
पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यापूर्वी कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढा देण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी भारत-पाकिस्तान वनडे मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता.अख्तर म्हणाला की, "भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही देशांमध्ये प्राणघातक विषाणूविरूद्ध लढण्यासाठी एकत्रितपणे निधी जमा करण्यासाठी रिक्त स्टेडियममध्ये मालिका खेळली जाऊ शकते."भारत-पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांत प्रेक्षकांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळतो. भारताचे माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनी या मालिकेसाठी सध्याची स्थिती पाहता मनाई केली असली तरी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) मात्र अख्तरचे हा प्रस्ताव ठेवण्यासाठी कौतुक केले आणि सोबतच नरेंद्र मोदी सरकारवर (Narendra Modi Government) निशाणा साधला. आफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तानला भारताविरूद्ध खेळायचे आहे, परंतु मोदी सरकारमुळे त्याची शक्यता फारशी अस्पष्ट आहे. (Coronavirus: शोएब अख्तरच्या भारत-पाकिस्तान मालिकेच्या प्रस्तावावर कपिल देवची गुगली, पाहा काय म्हणाले वर्ल्ड कप विजेते कर्णधार)
भारत सरकारने यापूर्वीच हे स्पष्ट केले आहे की पाकिस्तानने सीमापार दहशतवाद रोखल्याशिवाय आणि द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करणार नाहीत. “आम्हाला भारताविरुद्ध खेळायचे आहे, परंतु मोदी सरकारमुळे त्यांच्याकडून नकारार्थीपणा येत असल्याने हे कठीण आहे. पाकिस्तान नेहमीच सकारात्मक होता परंतु भारतानेही आपल्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे, 'असे आफ्रिदीद्वारे ट्विटरवर पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी सांगितले. “क्रिकेटने नेहमीच पाकिस्तान आणि भारत जवळ आले म्हणून भारताशी संबंध चांगले असले पाहिजेत. मी शोएब अख्तरशी सहमत आहे, आमचे सामने असले पाहिजेत पण ते आयोजन कोठे होणार किंवा भारताला खेळायचे असल्यास ते आयोजित करणे मोठे आव्हान असेल," असेही तो पुढे म्हणाले.
Shahid Afridi "We want to play against India, but it's difficult in this situation because of the Modi Government as there is negativity coming from them. Pakistan has always been positive but India also has to take a positive step towards us" #Cricket
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) April 12, 2020
भारत-पाकिस्तानमध्ये 2007 नंतर एकही द्विपक्षीय टेस्ट आणि वनडे मालिका खेळलेली नाही. या दरम्यान पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता. यावेळी दोन्ही टीममध्ये तीन टेस्ट आणि 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. त्यांनी डिसेंबर 2012 मध्ये भारतात तीन एकदिवसीय मालिका आणि दोन टी-20 ची एक छोटी मालिका खेळली होती, त्यांनतर दोघेही फक्त आयसीसी आयोजित कार्यक्रम किंवा आशिया चषकात आमने-सामने येतात.
(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2020 02:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

