Rohit Sharma And Yashasvi Jaiswal (Photo Credit - X)

IND vs BAN 2nd Test Day 4: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याचा साथीदार सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये टी-20 ची मजा दिली. बांगलादेशविरुद्ध कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दोघांनी मिळून अवघ्या तीन षटकांत 50 धावांचा टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये विक्रम अस्तित्वात असल्यापासून कोणत्याही संघाने केलेले हे सर्वात जलद अर्धशतक आहे. भारताने या बाबतीत इंग्लंडचा विश्वविक्रम मोडला. या वर्षी ट्रेंट ब्रिज कसोटीत इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध 4.2 षटकांत 50 धावा केल्या होत्या, भारताने अवघ्या तीन षटकांत ही कामगिरी करून इंग्लंडचा विक्रम मोडला होता.

इंग्लंड सलग पाचव्या स्थानपर्यंत कायम

1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4.3 षटकात 50 धावा करणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाकडून सर्वात जलद पन्नास धावा करण्याच्या बाबतीत इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचे नावही येते, ज्यानी 2002 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 5 षटकांत 50 धावा केल्या होत्या. (हे देखील वाचा: Ravindra Jadeja 300 Wickets in Test Cricket: कानपूर कसोटीत रवींद्र जडेजाचा भीम पराक्रम! ठरला पहिला आशियाई गोलंदाज)

बांगलादेशने पहिल्या डावात केल्या 233 धावा

त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बांगालदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशने पहिल्या डावात दहा विकेट गमावून 233 धावा केल्या. बांगलादेशकडून मोमिनुल हकने नाबाद 107 सर्वाधिक धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन आणि सिराज-अश्विनने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.