Champions Trophy 2025 Final: फायनलमध्ये विराट-रोहित नाही; 'हा' खेळाडू ठरेल गेम चेंजर, आर अश्विनने केली मोठी भविष्यवाणी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा एक खेळाडू गेम चेंजर ठरेल अशी भविष्यवाणी समोर आली आहे. विराट किंवा रोहित नाही तर श्रेयस अय्यर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गेम चेंजर असेल,” असे आर अश्विनने म्हटले.
Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) फायनलकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ (IND vs NZ) अंतिम सामन्यात भिडण्यासाठी सज्ज आहेत. हा सामना रविवारी, 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या गेम चेंजर खेळाडूबद्दल एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोणता खेळाडू टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो हे माजी भारतीय दिग्गजाने सांगितले. India vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 Final: पावसामुळे फायनल रद्द झाली तर कोण जिंकेल? रिझर्व्ह डेचे नियम काय? जाणून घ्या
आर अश्विनची मोठी भविष्यवाणी
“माझ्यासाठी, श्रेयस अय्यर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गेम चेंजर असेल,” असे आर अश्विनने यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. प्रत्येक सामन्यात त्याची बॅट टीम इंडियासाठी मोठ्या धावा बनवत आहे.
Ravi Ashwin picks Shreyas Iyer as the game changer player for India in the CT Final. (Ash Ki Baat). pic.twitter.com/YzYeKJD0aQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2025
दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज बनला आहे. अय्यर सातत्याने या क्रमांकावर फलंदाजी करताना धावा करत आहे. आतापर्यंत अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये 195 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 2 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात अय्यरने 45 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. या स्पर्धेत अय्यरची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी 79 धावांची आहे. आता संघ आणि भारतीय चाहत्यांना अंतिम सामन्यातही अय्यरकडून शानदार खेळीची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, विराट कोहली हा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. कोहलीने 4 सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 217 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. कोहलीने हे शतक पाकिस्तानविरुद्ध केले.
(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2025 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

