India Beat Bangladesh: टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिल्यानंतर आर अश्विनने केलं मोठं विधान, म्हणाला...
R Ashwin (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी खिशात घातली. 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 74 धावांत 7 विकेट्स गमावून मोठ्या अडचणीत दिसत होती, मात्र आर अश्विनने (R Ashwin) 42 धावांची नाबाद खेळी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. त्याची गोलंदाजीतील कामगिरीही चांगली होती आणि याच कारणामुळे अश्विनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर आर अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आणि सामन्याबद्दल आपले विचार काय आहेत हे सांगितले.

काय म्हणाला अश्विन?

टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू आर अश्विन म्हणाला की, आमच्याकडे फारशी फलंदाजी उरलेली नाही. हा एक सामना होता जो आम्ही सहज जिंकू शकलो असतो तेव्हा आम्ही आमचा हात सोडला होता. श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली. कधीकधी अशा परिस्थितीत आपल्याला असे वाटते की आपल्याला गोष्टींसह पुढे जाण्याची आवश्यकता आहे. बांगलादेशने चांगली गोलंदाजी केली आणि मला वाटते की आम्ही आमच्या बचावावर विश्वास दाखवला नाही. इथली खेळपट्टी खूप चांगली आहे, पण मला वाटतं की चेंडू खूप लवकर मऊ झाला. बांगलादेशचे कौतुक केले पाहिजे कारण ते अनेक प्रसंगी आमच्यावर दबाव आणू शकले.

आर अश्विनची चमकदार कामगिरी

भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने दुसऱ्या कसोटी सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीसह चमकदार कामगिरी केली. या सामन्यात अश्विनने पहिल्या डावात घेतलेल्या चार विकेट्ससह पहिल्या गोलंदाजीत एकूण 6 बळी घेतले. दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत असताना अश्विनने आपला अनुभव आणि समज दाखवत 62 चेंडूत नाबाद 42 धावांची शानदार खेळी करत टीम इंडियाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. (हे देखील वाचा: WTC Final: भारताच्या विजयाने 'या' संघाच्या अडचणी वाढल्या, जागतिक कसोटी अंजिक्यपदच्या फायनलची लढत झाली रोमांचक)

भारचीय संघ मजबूत स्थितीत

या मालिकेनंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अंजिक्यपदच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण चार संघ जागतिक कसोटी अंजिक्यपदच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत राहिले आहेत.