
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना काल म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी खेळला गेला, जो टीम इंडियाने 99 धावांनी जिंकला. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) शानदार गोलंदाजी करत एकूण 3 बळी घेतले. यासह आर अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत माजी दिग्गज अनिल कुंबळेला (Anil Kumble) मागे टाकले आहे आणि असे करणारा तो नंबर-1 भारतीय गोलंदाज बनला आहे. माजी दिग्गज अनिल कुंबळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत भारतासाठी पहिले होते. मात्र दुसऱ्या वनडेत आर अश्विनने 3 बळी घेतल्यानंतर कुंबळेचा हा विक्रम मोडीत निघाला.
अश्विनने कुंबळेचा अनेक वर्षांचा जुना विक्रम मोडला
अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत एकूण 144 विकेट घेतल्या आहेत. तर कुंबळेने 142 विकेट घेतल्या. मात्र, अश्विनने कुंबळेचा अनेक वर्षांचा जुना विक्रम मोडला, त्यानंतर त्याच्या विश्वचषक खेळण्याची शक्यताही वाढली आहे. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला व्हिसा मंजूर, दोन्ही संघ त्यांच्या योजनांनुसार करु शकतात प्रवास)
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वोत्तम उभारली धावसंख्या
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 399 धावा केल्या. यासह टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्याही केली आहे. यापूर्वी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 383 धावा केल्या होत्या. पण आता संघाने 399 धावा केल्या आहेत.
कसा होता सामना?
या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 399 धावा केल्या. संघाकडून श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या आणि शुभमन गिलने 104 धावांचे शानदार शतक झळकावले. याशिवाय केएल राहुलनेही अर्धशतक झळकावले. तर सूर्यकुमार यादवने वेगवान खेळी खेळली आणि अवघ्या 37 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पाण्यामुळे दुसऱ्या डावात व्यत्यय आला, त्यामुळे सामना 33 षटकांचा करण्यात आला. ऑस्ट्रेलियाला 33 षटकात 317 धावांचे लक्ष्य मिळाले. पण संघ 28.2 षटकांत 217 धावांवरच मर्यादित राहिला.