Asia Cup 2023: पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताविरुद्ध ओकली गरळ! म्हणाला, 'आम्ही भारताला कुठेही हारवु शकतो'

अलीकडेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला होता की, भारत-पाकिस्तान सामने अलीकडच्या काळात एकतर्फी होत आहेत. गांगुलीच्या या विधानावर वकार युनूसने (Waqar Yunus) प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान संघ भारताला कुठेही हरवू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

Asia Cup 2023: पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताविरुद्ध ओकली गरळ! म्हणाला, 'आम्ही भारताला कुठेही हारवु शकतो'
IND vs PAK (Photo Credit - Twitter)

आशिया कप 2023 चे (Asia Cup 2023) वेळापत्रक 19 जुलै रोजी जाहीर करण्यात आले आहे. यानंतर दोन्ही देशांतून भाषणबाजीचा टप्पा सुरू झाला आहे. अलीकडेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला होता की, भारत-पाकिस्तान सामने अलीकडच्या काळात एकतर्फी होत आहेत. गांगुलीच्या या विधानावर वकार युनूसने (Waqar Yunus) प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान संघ भारताला कुठेही हरवू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. ओव्हलवर खेळल्या गेलेल्या 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचे उदाहरण देताना वकार युनूस म्हणाला की जर पाकिस्तान संघ भारताला ओव्हलवर पराभूत करू शकतो, तर त्याच्याकडे कुठेही हरवण्याची क्षमता आहे. आशिया चषक 2023 च्या वेळापत्रकानुसार, भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे सामना होणार आहे. ज्यांच्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

आम्ही भारताविरुद्ध अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या नाहीत पण चांगली गोष्ट म्हणजे या मुलांनी अलीकडे भारताविरुद्ध मोठ्या सामन्यांमध्ये विजय मिळवायला सुरुवात केली आहे. हे एक चांगले लक्षण आहे. आमच्या संघात टॅलेंट आहे, जर आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळू शकलो तर ते भारताला पराभूत करू शकत नाहीत याचे मला कोणतेही कारण दिसत नाही. ते कुठे खेळतात याने काही फरक पडत नाही. भारत असो, पाकिस्तान असो, श्रीलंका असो, ओव्हलवर आपण त्यांना हरवू शकलो तर कुठेही हरवू शकतो. (हे देखील वाचा: Ayesha Naseem Retired: धर्मासाठी क्रिकेटची कुर्बानी! वयाच्या 18व्या वर्षी पाकिस्तानची टॉप ऑर्डर बॅटर आयशा नसीम निवृत्त)

1992 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. तेव्हापासून भारत आयसीसी स्पर्धांमध्ये वनडे फॉरमॅटमध्ये अपराजित राहिला आहे. दुसरीकडे, 2021 साली झालेल्या T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता, पण भारताने 2022 च्या T20 विश्वचषकातील सर्वात मोठ्या विजयासह त्या पराभवाचा बदला घेतला.

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2023 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).