IND W vs AUS W: भारताच्या पोरींनी उधळला फायनलचा गुलाल! जेमिमाच्या धडाकेबाज खेळीनं भारताची अंतिम फेरीत धडक, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सनी पराभव
महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताचा हा पाचवा उपांत्य सामना होता आणि आता २ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३३९ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते.
Women's World Cup 2025: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा उपांत्य सामना DY पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताचा हा पाचवा उपांत्य सामना होता आणि आता २ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३३९ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, जेमिमा रॉड्रिग्जच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने ४८.३ षटकांत हे लक्ष्य सहज गाठले.
सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग
महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. यापूर्वीचा विक्रम ३३० धावांचा होता, जो याच वर्षात ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताविरुद्ध केला होता. जेमिमा रॉड्रिग्जने १२७ धावांची ऐतिहासिक, सामना जिंकून देणारी खेळी केली.
#Final, 𝗛𝗘𝗥𝗘 𝗪𝗘 𝗖𝗢𝗠𝗘! 🇮🇳#TeamIndia book their spot in the #CWC25 final on a historic Navi Mumbai night! 🥳👏
Scorecard ▶ https://t.co/ou9H5gN60l#WomenInBlue | #INDvAUS pic.twitter.com/RCo6FlbXSX
— BCCI Women (@BCCIWomen) October 30, 2025
ऑस्ट्रेलियाचा डाव: फोबी लिचफिल्डचे शानदार शतक
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांचा संघ ४९.५ षटकांत ३३८ धावांवर सर्वबाद झाला. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्ड हिने शानदार फलंदाजी केली आणि ११९ धावांचे शतक ठोकले. लिचफिल्ड आणि पेरी क्रीजवर असताना ऑस्ट्रेलिया ३५० हून अधिक धावा करेल असे वाटत होते, परंतु अमनजोत कौरने लिचफिल्डला बाद करून १५५ धावांची भागीदारी मोडली. लिचफिल्ड ९३ चेंडूत ११९ धावांवर बाद झाला.
त्यानंतर पेरीने (Perry) ७७ धावा करत जबाबदारी स्वीकारली. टहलिया मॅकग्रा १२ धावांवर धावबाद झाली. तथापि, अॅशले गार्डनरने शेवटी जलद खेळी करत ऑस्ट्रेलियाला ३०० च्या पुढे नेले. गार्डनर ६३ धावांवर धावबाद झाली. भारताच्या गोलंदाजीत: श्री चरण आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अमनजोत कौर, क्रांती गौर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताचा पलटवार: जेमिमा आणि हरमनप्रीतचा जलवा
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शफाली वर्मा ५ चेंडूत १० धावा करून, तर स्मृती मानधना २४ चेंडूत २४ धावा करून बाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची मोठी भागीदारी केली. सामन्यात हरमनप्रीत ८९ धावा करून बाद झाली. त्यानंतर दीप्ती शर्माने २४ धावांचे योगदान दिले. उर्वरित काम जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांनी पूर्ण केले. या सामन्यात भारतासाठी जेमिमा रॉड्रिग्जच्या १२७ धावांच्या सामना जिंकून देणाऱ्या खेळीमुळे भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला.
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2025 08:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

