Team India: भारतीय महिला करणार श्रीलंका, इंग्लंड दौरा; राष्ट्रकुल खेळांपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा वनडे कर्णधार, पाहा कोणाची दावेदारी

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या मार्गात भारतीय महिला क्रिकेट संघ येत्या काही महिन्यांत मर्यादित षटकांचे सामने खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्याची अपेक्षा आहे. आयसीएस महिला विश्वचषक 2022 सेमीफायनल पूर्वीच मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय महिला संघ पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे.

Team India: भारतीय महिला करणार श्रीलंका, इंग्लंड दौरा; राष्ट्रकुल खेळांपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा वनडे कर्णधार, पाहा कोणाची दावेदारी
भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स (Birmingham Commonwealth Games) 2022 च्या मार्गात भारतीय महिला क्रिकेट संघ (India Women's Cricket Team) येत्या काही महिन्यांत मर्यादित षटकांचे सामने खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर (Sri Lanka Tour) जाण्याची अपेक्षा आहे. आयसीएस महिला विश्वचषक 2022 सेमीफायनल पूर्वीच मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय महिला संघ पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय महिला संघ जून-जुलै या कालावधीत श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने आणि तितकेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. “संघ 18 जून रोजी श्रीलंकेत पोहोचेल. पहिला एकदिवसीय सामना 23 जून रोजी होणार आहे, तर पहिला टी-20 सामना 3 जुलै रोजी खेळला जाईल. या दौर्‍याची शेवटची टी-20 सामन्याने 7 जुलै रोजी होणार आहे,” असे बीसीसीआय सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. (Commonwealth Games 2022: पाकिस्तानची कर्णधार Bismah Maroof हिच्या मुलीला राष्ट्रकुल खेळ गावात ‘नो एन्ट्री’, CWG फेडरेशनने फेटाळली PCB ची अपील)

दरम्यान, आगामी दौऱ्यासाठी संघ निवडण्यासाठी बीसीसीआय वरिष्ठ निवड समितीची बैठक होणार असून निवड समिती नवीन वनडे कर्णधाराची निवड करण्याचीही शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला विश्वचषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या दिग्गज मिताली राजने निवृत्ती जाहीर केलेली नाही परंतु बोर्ड आता तिच्या पुढे पाहत आहे. मिताली आणि वरिष्ठ वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी या दोघींना पुण्यात 23 मेपासून सुरू होणाऱ्या आगामी महिला टी-20 चॅलेंजसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. वृत्तानुसार, महिला विश्वचषकात भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर भारताची टी-20 कर्णधार हरमनप्रीत कौरला एकदिवसीय संघाची कमान दिली जाण्याची पूर्ण शक्यता आहे. राज दीर्घ काळापासून भारतीय कर्णधार आहे पण हरमनप्रीतला तिच्यानंतर तिची जागा मिळण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारत कॉमनवेल्थ खेळात सहभागी होण्यासाठी बर्मिंगहॅमला रवाना होईल आणि अखेरीस इंग्लंडविरुद्धची मालिका खेळेल.

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळात महिलांच्या टी-20 स्पर्धेच्या उद्घाटनाच्या आवृत्तीत ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसोबत भारतीय संघाचा समावेश आहे. ही स्पर्धा 29 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल, ज्यामध्ये आठ संघ सहभागी होतील आणि त्यांना प्रत्येकी चार संघाच्या दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. CWG 2022 नंतर टीम इंडिया यजमान इंग्लंड विरुद्ध तीन टी-20 आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळेल, या दौऱ्यातील अंतिम सामना 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्स येथे होणार आहे. लक्षात ठेवायचे की या दोघांमध्ये कोणताही कसोटी सामना होणार नाही कारण इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) त्या कालावधीत महिलांच्या ‘द हंड्रेड’च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्याची योजना आखत आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2022 06:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).