IND Beat ENG 5th T20I Match Scorecard: मुंबईत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिका 4-1 ने जिंकली; अभिषेकने घातला धुमाकूळ

पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 247 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 97 धावांवर बाद झाला.

IND Beat ENG 5th T20I Match Scorecard: मुंबईत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिका 4-1 ने जिंकली; अभिषेकने घातला धुमाकूळ
Team India (Photo Credit - X)

मुंबई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना (IND vs ENG 5th T20I 2025) आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) खेळवला गेला. पाचव्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 247 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ फक्त 97 धावांवर बाद झाला. (हे देखील वाचा: Abhishek Sharma New Record: अभिषेक शर्मा ठरला सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू, रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला)

अभिषेक शर्माने झळकावले धमाकेदार शतक 

नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी आली पण त्यांची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का संजू सॅमसनच्या रूपात फक्त 21 धावांवर बसला. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी मिळून डावाची सूत्रे हाती घेतली आणि 136 धावांची भागीदारी रचली. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत नऊ विकेट गमावून 247 धावा केल्या. टीम इंडियाकडून सलामीवीर अभिषेक शर्माने 135 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान अभिषेक शर्माने 54 चेंडूत सात चौकार आणि 13 षटकार मारले. अभिषेक शर्मा व्यतिरिक्त शिवम दुबेने 30 धावा केल्या.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मार्क वूडने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. ब्रायडन कार्से व्यतिरिक्त मार्क वूडने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकांत 248 धावा कराव्या लागल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही निराशाजनक होती आणि संघाला फक्त 23 धावांवर पहिला मोठा धक्का बसला. संपूर्ण इंग्लंड संघ 10.3 षटकांत फक्त 97 धावा करून सर्वबाद झाला. इंग्लंडकडून सलामीवीर फिलिप सॉल्टने 55 धावांची तुफानी खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, फिलिप सॉल्टने 23 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकार मारले. फिलिप साल्ट व्यतिरिक्त जेकब बेथेलने 10 धावा केल्या.

त्याच वेळी, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी व्यतिरिक्त, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या टी-20 मालिकेनंतर, 6 फेब्रुवारीपासून टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 4763 05:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).