भारत गमावू शकतो World Cup 2023 चे यजमानपद, BCCI समोर आव्हान; घ्या जाणून, नेमके कारण काय?
आयसीसीने ने बीसीसीआयला विवादित समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या कठोर सूचना दिल्या आहेत, असे न झाल्यास आयसीसी विश्वचषक भारताबाहेर घेवुन जावू शकते.
ODI World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 (ICC ODI WC 2023) पुढील वर्षी भारतात (India) होणार आहे, परंतु विश्वचषक आयोजित करण्यावरून बीसीसीआय (BCCI) अडचणीत आहे. वास्तविक, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे यजमानपद भारताकडून हिरावून घेतले जाऊ शकते. एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आयसीसीमध्ये (ICC) बीसीसीआयवर हल्लाबोल करत असताना, भारतीय बोर्ड कराच्या मुद्द्यावरून भारत सरकारशी (Indian Govt) भांडत आहे. आयसीसीने ने बीसीसीआयला विवादित समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या कठोर सूचना दिल्या आहेत, असे न झाल्यास आयसीसी विश्वचषक भारताबाहेर घेवुन जावू शकते.
बीसीसीआयचा भारत सरकारसोबतचा कर वाद सुटलेला नाही
भारताने यापूर्वी 2016 मध्ये टी-20 विश्वचषकाचे आयोजन केले होते, परंतु बीसीसीआयने भारत सरकारसोबत कर विवाद सोडवण्यात अयशस्वी ठरला. त्यानंतर आयसीसीने बीसीसीआयच्या वार्षिक पैशातून 190 कोटी रुपये कापले. वास्तविक, ही पहिलीच वेळ आहे की आयसीसीने कर बिल 21.84 टक्के म्हणजे $116 दशलक्ष (रु. 900 कोटी) वाढवले आहे. जर बीसीसीआय भारत सरकारला विश्वचषक 2023 साठी कर सवलतीसाठी पटवून देण्यात अयशस्वी ठरले तर बोर्डाला 900 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे
विशेष म्हणजे, भारत 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषक 2016 भारतात आयोजित करण्यात आला होता. तर 2011 मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र, बीसीसीआय आणि भारत सरकार यांच्यातील करविषयक वाद किती काळ मिटणार, हे येत्या काही दिवसांत कळेल, पण भारतासाठी हे चांगले संकेत नाहीत. (हे देखील वाचा: IND vs BAN 1st Test Day 3: सामन्यादरम्यान घडली अशी घटना, ज्यामुळे बांगलादेशचा करोडो चाहत्यांसमोर झाला अपमान)
पाकिस्तानही टाकत आहे दबाव
याशिवाय तणावग्रस्त राजनैतिक संबंधांमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डही आयसीसीवर दबाव आणत आहे. जरी बीसीसीआयचा आयसीसीवर बराच प्रभाव असला तरीही, जर पाकिस्तानने 2023 च्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला तर ते आयसीसी आणि बीसीसीआय दोघांसाठीही अपमानास्पद असेल. यामुळे आयसीसीला सर्वात जास्त नुकसान होईल कारण ते भारत विरुद्ध पाकिस्तान सामना गमावतील. पीसीबीचे प्रमुख रमीझ राजा म्हणाले होते, 'आमची भूमिका स्पष्ट आहे की जर ते आशिया कप खेळायला आले तर आम्ही वर्ल्डकपला जाऊ, जर ते आले नाहीत तर त्यांना तसे करू द्या. त्यांना पाकिस्तानशिवाय खेळू द्या. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तान सहभागी झाला नाही तर कोण बघणार?' असे त्यांनी आपले वक्तव्य केले होते.
(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2022 10:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

