IND vs SA 1st ODI 2022: वनडे पदार्पणासाठी Venkatesh Iyer सज्ज, चौथ्या क्रमांकासाठी दोन खेळाडूंमध्ये चुरस; वाचा सविस्तर
केएल राहुल आणि विराट कोहली  (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st ODI 2022: कसोटी मालिकेनंतर भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येणार आहेत. 19 जानेवारी रोजी पार्ल (Paarl) येथे पाहिला  एकदिवसीय सामना रंगणार आहे. कर्णधारपदाच्या भूमिकेत विराट कोहली नसल्यामुळे, कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या (Team India) 1-2 अशा पराभवामुळे भारत दक्षिण आफ्रिकेत आपला पहिला विजय मिळवू शकला नाही. पण स्थायी कर्णधार केएल राहुलच्या  (KL Rahul) नेतृत्वात भारताला एकदिवसीय मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्याची संधी आहे. तथापि, राहुल आणि राहुल द्रविड यांची प्लेइंग इलेव्हनने डोकेदुखी वाढवली असेल, विशेषत: चौथ्या क्रमांकासाठी — श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) किंवा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) — यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. (India’s Likely Playing XI for 1st ODI: पहिल्या वनडेमध्ये भारताचे 11 धाकड खेळाडू देणार दक्षिण आफ्रिकेला टक्कर, ‘या’ अष्टपैलूला मिळू शकते डेब्यू तिकीट)

इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या मध्यात श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने चौथ्या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. फलंदाजीच्या क्रमवारीत वर आणि खाली जाण्याच्या लवचिकतेमुळे यादव चौथ्या क्रमांकासाठी आवडता बनला. तथापि, अय्यर परतला आहे आणि कसोटी पदार्पणातील त्याच्या शतकामुळे तो पुन्हा एकदा आवडता बनला आहे. कसोटी मालिकेत संधी न मिळाल्याने संघ व्यवस्थापन नक्कीच त्याला पहिल्या वनडेसाठी चौथ्या क्रमांकासाठी प्राधान्य देऊ शकतात. यामुळे सूर्यकुमारला पुन्हा एकदा आपल्या संधीसाठी वाट पाहावी लागेल. दुसरीकडे, रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत रविचंद्रन अश्विन जवळपास पाच वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज आहे. मात्र, दुसऱ्या फिरकीपटूच्या स्थानावर ही कोंडी आहे. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना व्यंकटेश अय्यरला अधिक षटके देण्याची इच्छा असल्याने त्याच्यासाठी वनडेमध्ये पदार्पणाचा रस्ता क्लिअर होताना दिसत आहे. अय्यरच्या समावेशामुळे भारताला चौथ्या सीम-बॉलिंगचा पर्याय मिळेल, ज्यामुळे युजवेंद्र चहलला पुनरागमनाचे दरवाजे उघडतील.

भारताने गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिका जिंकली होती. 6 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 5-1 ने जिंकला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाला पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करायला आवडेल. तसेच युवा खेळाडूंनी सुसज्ज टीम इंडियाला कसोटी मालिकेतील पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे.